Thursday, February 16, 2017

कवितेतील फुलपाखरे

ज्ञानपीठाची उंची

परवा लोकलमध्ये प्रवासात मी विजया
राजाध्यक्ष यांनी संपादित केलेले ‘करंदीकरांचे
समग्र लघुनिबंध’ वाचत होतो. मित्राला म्हटलं
हा असा अवलिया लेखक आहे की, दर दोन
पानानंतर मी मनातल्या मनात या माणसाचे
पाय धरतो. यांच्या निवडक कवितांच्या ‘संहिता’
नावाचा संग्रह आहे, तो मी कित्येकदा वाचलाय.
पुन्हा पुन्हा वाचतो आणि पुन्हा पुन्हा या
माणसाची कमाल वाटते. या कविमहात्म्याला
प्रत्यक्ष ऐकण्याचा अनेकदा योग आला. यातच
काही जीवन सार्थक झाले! ज्ञानपीठाची उंची
केवढी? हे जाणून घ्यायचं असेल तर कवी
मंगेश पाडगावकरांनी संपादित केलेला ‘संहिता’
हा काव्यसंग्रह वाचावा.
‘संहिता’ वाचताना मी वेळोवेळी टीका अधोरेखा
करून ठेवलेल्या ओळी इतक्या आहेत की, त्या
सर्व देणे अशक्यच. पण त्यातल्या निवडाव्या
कोणत्या, हाही प्रश्न पडतो. हे घ्या काही तुकडेकाळ्या
कुलपातून कुजते धान्य/आणि
तळमळ्यात अगा? अर्भके/काळाच्या क्यूत (ती
जनता अमर आहे)...
आणि जिचा आत्मा एक/ती जनता अमर आहे
(ती जनता अमर आहे)
छातीच्या सापळ्यातील मुठीएवढ्या उंदिरावर/
कशाला वटारतेस मांजराचे डोळे, ज्यांतील
संपले रडण्याचेही सामर्थ्य? (त्रिवेणी)
कुरकुरणार्‍या पाळण्यामधून दोन डोळे
उमलू लागतात आणि मग इवल्या इवल्या
मोदकमुठीतून तुझ्या स्तनांवर। बाळसे चढते।
(झपताल)
सद्गुरू - वाचोनी। सापडेल सोय। तेव्हा जन्म
होय? धन्यधन्य (आततायी अभंग)
जगाचे पोशिंदे। भुकेने भाजती। आणखी
माजती। मधलेच (आततायी अभंग) जागृतांनो
फेका। प्राणांच्या अक्षता । ऐसा योग आता पुन्हा
नाही? (आततायी अभंग).
- शब्दवैभव

कवितेतील फुलपाखरे

भूक

कवितेचा छंद हा जगण्याचा, जगणं समजून घेण्याचा,
समजून जगण्याचा छंद आहे. काही वर्षांपूर्वी मी एक
छोटा लेख लिहिला होता ‘हल्ली विनोद वाचल्यावर रडू
येते.’ तेव्हा एक ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणाले होते, असे नको
रे करू! विनोदात असे दुःख पाहू लागलास तर जगणे
अवघड होईल. परवा व्हॉटस्अ‍ॅपवर एक विनोद आला होता.
तो वाचून मला पुन्हा रडू आले. विनोद होता-
‘ती सध्या करते काय? (मग बरीच मोकळी जागा...
आणि मग उत्तर) ती काहीही करू दे. तू फ्लॅटफॉर्म आणि
पायदानातील अंतरावर लक्ष दे!’
मला लोकलने प्रवास करणार्‍या बापुडवाण्या
चाकरमान्यावरील ही अत्यंत करुण टिप्पणी वाटली.
बिचारा कधी खाली जाईल त्याचा नेम नाही.
आज गुलजारांच्या ‘त्रिवेणी’चा शांता शेळके यांनी केलेला
अनुवाद वाचताना एका त्रिवेणीने असाच विचार मनात
आणला. त्रिवेणी अशी आहेकोण
खाणार? कुणाचा हा वाटा?
दाण्यादाण्यावर लिहिले आहे नाव
शेठ सूरचंद मूलचंद जेठा!
केवढी करुण अवस्था आहे सामान्यांची! दाण्यादाण्यावर
लिहिले आहे नाव म्हणायचे. पण प्रत्येक दाण्यावर एकाच
शेठचे नाव लिहिलेले ही सगळ्यांची शोकांतिका! त्यातही
शेठ, सूरचंद, मूलचंद, जेठा या चारही अक्षरातले वजन
गरीब कसा चिरडला जातोय ते सुचविणारे!
मला वामनदादा कर्डक यांचे गाणे आठवले. त्यांनी
विचारले होते,
सांगा आम्हाला टाटा बिर्ला बाटा
कुठं आहे हाय हो
सांगा धनाचा साठा नि आमचा
वाटा कुठं हाय हो
इथल्या पददलिताची अवस्था इतकी वाईट की धनवान
टाटाबिर्लाबाटाचा पत्ताही त्याला माहीत नाही. तो त्याला
इतराकडे विचारावा लागतोय. अर्थातच धनाचा आपला
वाटा मिळण्याची शक्यता तेवढीच कमी!
कधी तरी एक गाणे लिहिले होते
लागं पोटाला या भूक
एक एवढीच चूक
अशा चुकीसाठी घ्यावं
का रं मुठीमध्ये नाक? दादा रं दादा रं ...
एका अभंगिकेत भुकेबाबत लिहिले आहे-
भुकेल्याच्या लेखी। कोण जीवशिव
एका वडापाव। ब्रह्म त्याचे

- शब्दवैभव