वसंत बापट यांच्या 'फुलराणीच्या कविता'
मोठ्या नाही रमता येते बालकवितांच्या जगातशेजारी दारावरून जाताना म्हणाला, 'चाळके काय करताय?'
मी म्हटलं, 'वाचत बसलोय....'
'काय वाचताय काय?' त्याने उत्सुकतेने चौकशी केली.
मी हातातील पुस्तकाचे मुखपृष्ठ त्या शेजाऱ्याला दाखविले.
'मुलांच्या कविता वाचताय? अजब आहात बाबा तुम्ही!' असे म्हणत शेजारी हसतहसत निघून गेला.
मोठ्या माणसाने बालकविता वाचणे ही गोष्ट तुम्हालाही अजब वाटते का? अनेकांना वाटू शकेल. पण मी मात्र अलीकडे पुन्हा एकदा बालकवितांच्या प्रेमात पडलो आहे.
विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट हे मराठीतील तीन कवी जवळपास चाळीस पन्नास वर्षे सातत्याने लिहीत होते आणि गावोगावी जाऊन आपल्या कविता रसिकांना ऐकवीत होते. महाराष्ट्राला कविता ऐकण्याची सवय या तिघांनी लावली. तिघेही वैशिष्ट्यपूर्ण असे कवी होते. त्यांची स्वतःची शैली होती आणि त्यांनी वैविध्यपूर्ण कविता लेखन केलेले आहे. आजही मराठी कवितेचा इतिहास काढून वाचायचा तर या तीन कवींना टाळून पुढे जाता येत नाही. अवघ्या महाराष्ट्रात कविता घेऊन फिरलेले हे त्रिकूट त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण सादरीकरणामुळेसुद्धा अत्यंत लोकप्रिय झाले होते. आता या तिघांपैकी कोणीही हयात नाही, पण त्यांचे साहित्य आजहीही रसिक आवडीने वाचत असतात. त्यांच्या या कवितेच्या सादरीकरणाचे ऑडिओ आणि व्हिडिओ प्रचंड लोकप्रिय आहेत.
या तिघांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या तिघांनीही अत्यंत सकस अशी बालकविता लिहिली. सांग सांग भोलेनाथ सारखे मंगेश पाडगावकरांचे बालगीत, छोटेसे बहिण-भाऊ उद्याला मोठाले होऊ सारखे वसंत बापट यांचे बालगीत मुलांना माना डोलवायला लावते. सर्कस वाला सारखी विंदा करंदीकर यांची दीर्घ बालकविता हसता हसता मुलांना विचारप्रवृत्त करते.
मंगेश पाडगावकर यांचे आधी बालकविता संग्रह महाराष्ट्रातल्या घराघरात आवडीने वाचले जातात. करंदीकरांचे परी ग परी सर्कस वाला पिशी मावशी राणीचा बाग हे बालकविता संग्रह मोठ्यांनाही पुन्हा पुन्हा वाचण्याचा मोह पाडतात. वसंत बापट यांचे चंगा मंगा तबडक तबडक आम्ही गरगर गिरकी फिरकी हे बालकविता संग्रहसुद्धा तितकेच वेड लावणारे आहेत.
अलीकडच्या काळात मला पुन्हा एकदा या बालकवितामध्ये रमावे वाटू लागले आहे. मुलासाठी म्हणून आणलेले हे संग्रह मी पुन्हा पुन्हा वाचत असतो.
लॉकडाऊनच्या काळात सगळी जुनी पुस्तके पुन्हा एकदा काढून चाळून झाली. त्यातील वसंत बापट यांचा फुलराणीच्या कविता हा बालकविता संग्रह आता माझ्यासमोर आहे. अतिशय सुंदर मुखपृष्ठ असलेल्या या संग्रहात उत्तम उत्तम बालकविता तर आहेतच, पण चंद्रमोहन कुलकर्णी यांनी काढलेली एकाहून एक सुंदर अशी चित्रे त्या कवितांना आणखीनच मोहक रूप प्राप्त करून देत आहेत. मुखपृष्ठावर एक चिमुकली गवतफुलांमध्ये असलेल्या एका काळ्याभोर खडकावर फुला फुलांचा फ्रॉक घालून बसली आहे. पाठीमागे एक मोठे झाड आहे. त्या झाडाच्या पार्श्वभूमीवर दोन पक्षी उडत आहेत. मागे डोंगर आणि त्यामागे निळं आकाश आहे. ही कन्या म्हणजेच फुलराणी आणि तिच्या या कविता.
चला तर आपण या कवितांचा आस्वाद घेऊ या. फुलराणीच्या कवितांमध्ये थोडा वेळ रमू या.
संग्रहातील पहिलीच कविता 'फुलराणी' नावाची आहे. त्या कवितेत फुलराणी छत्रीबद्दल बोलते-
पट्कन् बटन् दाबल्यावरती
झट्कन् होते खुली
लालजांभळ्या जास्वंदीची
सुंदर जशी कळी
भाजीवाली कवितेमध्ये फुलराणी भाजीवाली होते आणि भाजी विकू लागते. त्या कवितेचा शेवट पाहा किती गोड आहे.
भाजीवाली करते कमाल
एक चॉकलेटला सगळाच माल
खर्री चॉकलेटं दोन दोन द्यावी
भाजीवाली उचलून न्यावी!
डॉक्टर व्हायचं स्वप्न पाहणारी चिमुकली फुलराणी म्हणते,
आई तुला सांगून ठेवते शाळेत नाही जाणार
कॉलेजातच एकदम जाऊन मोठी डॉक्टर होणार
मी डॉक्टर झाल्यावरती कडू औषध बंद सर्दी खोकला काही होवो लॉलीपॉप देणार
बहिणी बहिणी ही बहिणीला लाडेलाडे चिडणारी कविता फार गोड आहे...
बहिणी ग बहिणी ग
आपण सख्ख्या बहिणी ग
भातुकलीच्या लग्नपुरत्या
भांडू विहिणी विहिणी गय!
जोडीच्या जोडीच्या
बहिणी-बहिणी जोडीच्या
झिंज्या ओढून झाल्यावरती
गप्पा लाडीगोडीच्या!
गट्टी ग गट्टी ग
पक्की अगदी गट्टी ग
तू आजारी पडल्यावरती
मीही घेते सुट्टी ग!
जोडी ग जोडी ग
जमली अपुली जोडी ग
मीच एकटी कशी शहाणी
तूच एकटी वेडी ग!
फुलराणीला प्रत्येक जण वेगवेगळ्या नावाने हाक मारतो. त्याबद्दलची एक कविता आहे, नावं तरी किती? नावाची. ती अशी आहे...
बाबा म्हणतात रंगी
आई म्हणते राणी
दादा म्हणतो चिमणाबाई
ताई म्हणते शाणी
आजोबांची वेडू
आजीची मी लाडू
कुठलं नाव ठेवू?
कुठलं नाव खोडू?
वर्गामध्ये वटवट केली
बाई म्हणतात टिटवी
हे आईला कळल्यावर
नवीन नाव सटवी!
एका छोट्या मुलीला
नावं तरी किती?
पुढे नवरा नाव बदलेल
ही आहेच भिती!
'इंद्रधनुष्य' ही संग्रहातली अठरावी आणि शेवटची कविता मोठ्यांनाही म्हणावी वाटेल अशीच आहे...
सात रंगांचं कारंज फुट्लं
इंद्रधनुष्य उगवलं म्हट्लं!!
सूर्य रडवेला
कुठे बाई गेला?
निळा निळा शेला
कुणी बाई नेला?
थेंबाथेंबाचे तोरण तुट्लं
इंद्रधनुष्य उगवले म्हट्लं!!
डोलतात फुलं
नाचतात मुलं
झुलतात तुरे
पळतात गुरे
वासरू होऊन वारं सुट्लं
इंद्रधनुष्य उगवलं म्हट्लं!!
झुला झुला झुला
सातरंगी झुला
झेला झेला झेला
रंग रंग झेला
आम्ही आनंद-भांडार लुट्लं
इंद्रधनुष्य उगवलं म्हट्लं!!
आणि मलपृष्ठावर श्रावणाची आरती आहे. कवी वसंत बापट यांनी अनेक गीते लिहिली आहेत. त्यांच्यातला गीतकार इथे श्रावण रंग उधळतो. या गीताचे शेवटचे कडवे पाहा केवढी सुंदर आहे...
गवतफुलांचा झुलतो ताफा
सुगंधी निश्वास टाकतो चाफा
नका भूईवर दण् दणा चालू
विस्कटू नका ग हिरवा शालू
गाऊ या नाचू या धरून ताला
आनंदाचा राजा श्रावण आला
जय रंग श्रीरंग, जय रंग श्रीरंग...
तुम्हाला काय वाटतं, बालकविता वाचतो म्हणून मला अजब म्हणणारा माझा शेजारी या कवितांमध्ये रमणार नाही? त्याचे सोडून देऊ... तुम्हाला आवडल्या ना?
- वैभव बळीराम चाळके
9702 723 652
पट्कन् बटन् दाबल्यावरती
झट्कन् होते खुली
लालजांभळ्या जास्वंदीची
सुंदर जशी कळी
भाजीवाली कवितेमध्ये फुलराणी भाजीवाली होते आणि भाजी विकू लागते. त्या कवितेचा शेवट पाहा किती गोड आहे.
भाजीवाली करते कमाल
एक चॉकलेटला सगळाच माल
खर्री चॉकलेटं दोन दोन द्यावी
भाजीवाली उचलून न्यावी!
डॉक्टर व्हायचं स्वप्न पाहणारी चिमुकली फुलराणी म्हणते,
आई तुला सांगून ठेवते शाळेत नाही जाणार
कॉलेजातच एकदम जाऊन मोठी डॉक्टर होणार
मी डॉक्टर झाल्यावरती कडू औषध बंद सर्दी खोकला काही होवो लॉलीपॉप देणार
बहिणी बहिणी ही बहिणीला लाडेलाडे चिडणारी कविता फार गोड आहे...
बहिणी ग बहिणी ग
आपण सख्ख्या बहिणी ग
भातुकलीच्या लग्नपुरत्या
भांडू विहिणी विहिणी गय!
जोडीच्या जोडीच्या
बहिणी-बहिणी जोडीच्या
झिंज्या ओढून झाल्यावरती
गप्पा लाडीगोडीच्या!
गट्टी ग गट्टी ग
पक्की अगदी गट्टी ग
तू आजारी पडल्यावरती
मीही घेते सुट्टी ग!
जोडी ग जोडी ग
जमली अपुली जोडी ग
मीच एकटी कशी शहाणी
तूच एकटी वेडी ग!
फुलराणीला प्रत्येक जण वेगवेगळ्या नावाने हाक मारतो. त्याबद्दलची एक कविता आहे, नावं तरी किती? नावाची. ती अशी आहे...
बाबा म्हणतात रंगी
आई म्हणते राणी
दादा म्हणतो चिमणाबाई
ताई म्हणते शाणी
आजोबांची वेडू
आजीची मी लाडू
कुठलं नाव ठेवू?
कुठलं नाव खोडू?
वर्गामध्ये वटवट केली
बाई म्हणतात टिटवी
हे आईला कळल्यावर
नवीन नाव सटवी!
एका छोट्या मुलीला
नावं तरी किती?
पुढे नवरा नाव बदलेल
ही आहेच भिती!
'इंद्रधनुष्य' ही संग्रहातली अठरावी आणि शेवटची कविता मोठ्यांनाही म्हणावी वाटेल अशीच आहे...
सात रंगांचं कारंज फुट्लं
इंद्रधनुष्य उगवलं म्हट्लं!!
सूर्य रडवेला
कुठे बाई गेला?
निळा निळा शेला
कुणी बाई नेला?
थेंबाथेंबाचे तोरण तुट्लं
इंद्रधनुष्य उगवले म्हट्लं!!
डोलतात फुलं
नाचतात मुलं
झुलतात तुरे
पळतात गुरे
वासरू होऊन वारं सुट्लं
इंद्रधनुष्य उगवलं म्हट्लं!!
झुला झुला झुला
सातरंगी झुला
झेला झेला झेला
रंग रंग झेला
आम्ही आनंद-भांडार लुट्लं
इंद्रधनुष्य उगवलं म्हट्लं!!
आणि मलपृष्ठावर श्रावणाची आरती आहे. कवी वसंत बापट यांनी अनेक गीते लिहिली आहेत. त्यांच्यातला गीतकार इथे श्रावण रंग उधळतो. या गीताचे शेवटचे कडवे पाहा केवढी सुंदर आहे...
गवतफुलांचा झुलतो ताफा
सुगंधी निश्वास टाकतो चाफा
नका भूईवर दण् दणा चालू
विस्कटू नका ग हिरवा शालू
गाऊ या नाचू या धरून ताला
आनंदाचा राजा श्रावण आला
जय रंग श्रीरंग, जय रंग श्रीरंग...
तुम्हाला काय वाटतं, बालकविता वाचतो म्हणून मला अजब म्हणणारा माझा शेजारी या कवितांमध्ये रमणार नाही? त्याचे सोडून देऊ... तुम्हाला आवडल्या ना?
- वैभव बळीराम चाळके
9702 723 652
No comments:
Post a Comment