सुखाच्या दिशेने
लहानपणी आई रागवली, तिने मारलं की आपल्याला त्या पारतंत्र्याचा प्रचंड राग येतो. आपल्याला स्वतःचं काही स्वातंत्र्य नाही. कशाला हे ठरवून दिलेलं आयुष्य जगतोय आपण! असं वाटून घर सोडण्याचे किंवा कधी तरी चक्क आत्महत्येचेच विचार मनात येतात. पण साधारण पंधरावीस वर्षे उलटली की तेच घर नावाचे "पारतंत्र्य' हवेहवेसे वाटू लागते. मग आपण लग्न करतो. मूल होऊ देतो. कुणीही कोणाला गुलाम बनवणे केव्हाही वाईटच. त्याचा सदैव निषेधच करायला हवा. पण जी गुलामी स्वखुशीने स्वीकारली जाते त्यात एक लोभसपणा आहे. (निष्ठावान, दास वगैरे शब्दांनी आपण तिचा अभिमानाने उल्लेख करतो) हा लोभसपणा ध्यानी आला की ओठावर शब्द येतात- "मी तुझा गुलाम मर्जीने! हा तुला सलाम मर्जीने!!' हिंदी कवयित्री संत मीराबाई म्हणते- "मैं तो अपने नारायण की आपही हो गई दासी रे।' ही अशी गुलामी पत्करावी. इतकी मोठी आणि प्रेमळ माणसे लाभणे हे केवढे तरी मोठे सुखच होय.
सुखाची दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुख प्रत्येकाचं वेगळं. एकाला ज्यात सुख मिळेल त्यात दुसऱ्याला मिळणार नाही. म्हणून जर आपल्याला सुखी व्हायचे असेल तर आपण इतरांसारखं जगून चालणार नाही. आपण इतरांसारखे जगून सुखी व्हायचे म्हटले तर ते अवघड आहे. आपल्याला आपला मार्ग शोधायला हवा. प्रसंगी तो बांधायला हवा. मेहनतीने बांधायला हवा. मात्र इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. इतरांच्या मार्गाने जायचे नाही. पण त्यांच्या मार्गाला कमीही लेखायचे नाही. आपण निवडलेला सुखाचा मार्ग हा एकमेव मार्ग नव्हे. तो आपत्यासाठी सुखाचा मार्ग आहे. सचिन तेंडुलकर फार शिकला नाही. पण तरीही तो महान ठरला. कारण त्याने आपल्या सुखाचा मार्ग निवडला. घडवला. गंमत पाहा, अब्जोपती असलेला सचिन आजही मैदानात घाम गाळतो. का माहीत आहे? कारण तोच त्याच्या सुखाचा मार्ग आहे.
काही वर्षांपूर्वी एक पुस्तक वाचले होते. दोन मराठी वकिलांनी ते लिहिले होते. त्यात त्यांनी "मानवाभिमुखतेचे शास्त्र' ही कल्पना मांडली होती. त्यात त्यांनी म्हटलं आहे, " तुम्ही असे जगा की त्यामुळे इतरांना जगण्यास मदत होईल. थोडक्यात जगताना इतरांचा विचार करा. प्रत्येकजण असा इतरांचा विचार करू लागला तर अवघं जग सुंदर होऊन जाईल. म्हणजे तुम्ही तुमच्या संस्थामध्ये दिशादर्शक व विभागदर्शक पाट्या लावा. शहराचे नियोजन असे करा की बाहेरून आलेला इसम सहज वावरू शकेल. घर असे लावा की कोणती गोष्ट कोठे आहे ते कोणलाही सहज कळले.' त्यांनी मांडलेली कल्पना ही आदर्शची कल्पना होती. आदर्श सहसा हाती येत नाही. पण त्या दिशेने सुरू झालेला प्रवास आपले आयुष्य नक्कीच आनंदी करू शकतो. अनेक वर्षे छोट्या छोट्या पातळ्यांवर हा प्रयोग करून पाहिला आणि तो अमाप आनंद देणारा ठरला आहे. एखाद्याला माहीत नसलेला मार्ग दाखवणे, एखाद्याला गाडीत चढायला- उतरायला मदत करणे, एखाद्या अंधाला रस्ता ओलांडायला करण्यासाठी मदत करणे, एखाद्या आजोबांना आधाराला हात देणे या गोष्टीही अमाप सुख देणाऱ्या-मिळविणाऱ्या ठरू शकतात.
एखाद्याच्या मनाला उभारी येईल असे दोन शब्द बोललात तरी तो "सुखमय' होऊ शकतो. पण आपल्याकडे असे प्रोत्साहनपर शब्द उच्चारण्यापेक्षा एखाद्याला वास्तवाची कठोर जाणीव देण्याचं "पुण्यकर्म' करणाऱ्यांची सख्या जास्त. दुर्दैवाने "आपल्या वाट्यास आले तेच वास्तव' ही आपली कल्पना त्या दुसऱ्याच्या माथी मारतो. एका वक्त्याने या स्वभावाच्या मंडळींच्या अखंड "यज्ञाला' "दुःखी आत्मा मंडळ' नाव ठेवल्याचे ऐकले होते आणि हे दुःखी आत्मामंडळ जगभर कार्यरत असून नेटवर्क मार्केटिंग करणारी ही सर्वात मोठी कंपनी असल्याचे त्याने म्हटले होते. आपल्या स्पष्टीकरणात तो वक्ता म्हणाला होता, कोणीही काही चागले काम करू लागला की त्याला या दुःखी आत्मा मंडळाचा माणूस भेटतो आणि म्हणतो, हे शक्य नाही रे. तुझ्या सारखे छप्पन्न जण पाहिले करेन म्हणणारे. एकालाही जमले नाही. तू उगाच नाही ती स्वप्ने पाहू नकोस, गप्प मळलेल्या वाटेने चाल! त्याच्या या वास्तवाच्या कडव्या विचाराने बिचारा पुढे टाकलेले पाऊल मागे घेतो आणि स्वत: त्या दु:खी आत्मा मंडळाचा सभासद होऊन इतरांना मागे खेचत राहतो. तुम्ही या दु:खी आत्मा मंडळाकडे दुर्लक्ष करायला शिका .
सुखाच्या दिशेने जाताना आणखी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट करायला हवी ती म्हणजे पैशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन योग्य असायला हवा. आपण पैशाकडे दोन टोकाच्या भूमिकेत पाहतो. एकतर अतिगर्वाने पैसा कुत्राही खात नाही किंवा पैसा काय वेश्याही कमवते! अशी वाक्ये उच्चारली जातात किंवा पैसा पैशाकडे जातो बाबा! किंवा आमच्या नशिबात नाही तर येणार कुठे आमच्याकडे पैसा ही वाक्ये उच्चारली जातात. पैशाविषयी हा दृष्टिकोन वाईट आहे. पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे. पण जगायला पैसा लागतो. पैशाने सगळे प्रश्न सुटत नाहीत, पण अनेक प्रश्न केवळ पैशानेच सुटतात हे आपण समजून घेतले पाहिजे. खूप पैसा कमविणे वाईट नसते. वाईट मार्गाने कमविणे वाईट असते. दारिद्र्याचं समर्थन करण्यात कोणताच पुरुषार्थ नाही.
इथे आणखी एक गोष्ट म्हणजे आपण स्वत:ला , स्वत:च्या क्षमतांना आणि मर्यादांना ओळखायला हवे. आपली इतरांबरोबर तुलना न करता स्वत:चा मार्ग निवडायला हवा. तुमचा शेजारी, नातेवाईक तुमच्यासारखा नसतो. म्हणून त्याचे घर, कमाई, जीवन तुमच्यासारखे नसते हे ओळखा. तुलना अनेकदा दु:खाचे कारण होते. ती टाळा. रोज स्वत:ला स्वत:पेक्षा उंच करा. इतरांपेक्षा उंच होण्याचा अट्टाहास सोडा.
आहे ते अनुभवा! गृहित धरू नका! आपण अनेक गोष्टी गृहित धरतो. मग त्यापासून मिळणारे सुख आपल्याला आनंदच देईनासे होते. मी अनेकांना विचारतो, उन्हातून घरी गेल्यावर, फ्रिजचे पाणी पितांना आपण सुखी आहोत असे वाटते का रे? मला कुणीही याचें उत्तर "हो' असे देत नाही. वाटते ना, बरे वाटते, त्यात काय? असेच उद्गार बाहेर पडतात. हे झाले एक उदाहरण. आपण सुखसोयी खरेदी करतो पण त्याचे सुखच घेत नाही. हे सगळे सुख गृहित धरल्यामुळे उणे होते. ते तुम्ही टाळा. झेन संप्रदायात टी ड्रिकिंग नावाचा एक ध्यानप्रकार आहे. त्याचा अर्थ हाती आलेल सुख सर्वार्थाने अनुभवणे तुम्ही हा प्रकार करून पाहा.
आपल्या सुखाआड येणारी आणखी एक गोष्ट म्हणजे आजार. कोणताही आजार आपल्याला त्रास देतोच. पण त्या आजाराला कवटाळून बसण्यात अनेकजण धन्यता मानतात. आजार वेळीच दूर करण्याचा प्रयत्न करा. तो आज आहे आणि उद्या जाणार आहे या दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहा. एका पुस्तकात एक वाक्य वाचले, आजाराचे दहन करता आले नाही तर दहन करायला शिका. त्याचा अर्थ तो आजार जात नाही. त्याला सोबत घेऊन आनंदाने कसे जगता येईल ते पाहा. आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ लेखकाने, दर आठवड्याला डायलेसिस घेत संपूर्ण भारतभ्रमण करणाऱ्या एका जिगरबाज महिलेचे उदाहरण दिले आहे. आपल्या कोणत्याही आजारापेक्षा आपली आजाराची कल्पनाच अनेकदा खूप वाईट असते. तशी वाईट कल्पना करणे सोडायला हवे.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुखाच्या दिशेने जाताना आपल्या वाटेवर आपण स्वत:च प्रकाश टाकायला हवा. दुसऱ्याने टाकलेल्या प्रकाशावर विसंबून भागायचे नाही. आपली वाट शोधा. स्वत:च्या बुध्दीच्या तेजाचेे दीप त्या वाटेच्या दोन्ही बाजूस उजळवा आणि दिमाखात चालत राहा. सुखाच्या दिशेने जाण्यासाठी तुमच्याच या सह प्रवाशाच्या तुम्हाला मन:पूर्वक शुभेच्छा!
- वैभव बळीराम चाळके
Friday, May 20, 2011
Tuesday, May 17, 2011
ऐकण्याची कला आत्मसात करायलाच हवी, तिने चुंबिलेली लिलीची फुले
ऐकण्याची कला आत्मसात करायलाच हवी!
एका छोट्याशा कंपनीतील ही गोष्ट आहे. त्या कंपनीत साधारण 15-20 कर्मचारी काम करत होते. विजय हा त्यातीलच एक. बऱ्यापैकी हुशार. कामसू सदैव तत्पर असणारा, पण आठवड्यातून एकदा तरी त्याचे सर त्याला सर्वांसमोर झापायचे. मग तो जिव्हारी लागल्यासारखा तडफडायचा आणि "माणसाची किंमतच नाही! कोण मेहनत करतो ते दिसतच नाही! माझे नशीबच फुटके' असे काहीबाही बरळत राहायचा. पुन्हा दुसऱ्या दिवशी आपण कसे कामासाठी सदैव तत्पर असतो, हे दाखविण्यासाठी पुढेपुढे करू लागायचा. सरांचा कालचा राग जावा म्हणून आज प्रयत्न करू लागायचा. सरांनी एखादे काम सांगितले की, खूष होऊन ते उत्साहाने करायचा, परंतु त्यात हमखास चूक करून ठेवायचा आणि पुन्हा ओरडा खायचा.
कधी सर सांगायचे, "एक टेबल आणि दोन खुर्च्या हव्या आहेत आपल्याला, जरा किमती काढून ये.' दुसऱ्या दिवशी हा एखाद्या फर्निचर मालकालाच ऑफिसात हजर करायचा. त्या फर्निचरवाल्याला घरचा रस्ता दाखविल्यावर सर विजयला झापायचे, "तुला किमती काढायला सांगितल्या होत्या. फर्निचरवाल्याला बोलावून आणायला नव्हे.' मग याची बोलती बंद व्हायची. चेहरा कसनुसा व्हायचा. कधी सर सांगायचे, "तुझ्या घरच्या वाटेवर रद्दीवाला आहे ना, त्याला रद्दी घेऊन जायला सांग.' दुसऱ्या दिवशी रद्दीवाला दोन मुलांना घेऊन यायचा. सर रद्दीवाल्याला म्हणायचे,"ही दोन मुले कशाला घेऊन आला आहेस? दहा किलो तर रद्दी आहे अवघी!' तर तो म्हणायचा, " साहेब जुन्या खुर्च्या, टेबल आणि फॅन पण न्यायचा आहे ना?' "कोणी सांगितले तुला?' सर त्याच्यावर वैतागायचे. मग आपण त्याला उगाच बडबडतोय हे लक्षात येऊन, विजयला बोलावून त्या रद्दीवाल्यासमोर त्याची रद्दी करून टाकायचे. मग विजय संबंध दिवस वैतागत राहायचा. सायंकाळी सुटल्यावर तसाच वैतागत घरी जायचा आणि घरच्यांचीही सायंकाळ खराब करून टाकायचा.
आपल्या इज्जतीचे पार पोतेरे करून घेतले होते त्याने. त्याची चूक एकच होती- त्याला ऐकण्याची कला अवगत नव्हती. म्हणजे त्याला दोन कान होते, ते दोन्ही कान तांत्रिकदृष्ट्या सक्षम होते. पण ऐकणे- उत्तम ऐकणे ही एक कला आहे याची त्याला जाणीव नव्हती. तो कोणाचेही संपूर्ण ऐकत नसे. संपूर्ण लक्ष देऊन तर त्याने कधीच काही ऐकलेले नाही. त्याचा दोष हा एवढाच होता. पण तोच फार मोठा होता. त्याच्या एका सहकाऱ्याने त्याला हे सांगण्याचा एक-दोनदा प्रयत्न केला, तर तो त्या सहकाऱ्यावरच वैतागला आणि म्हणाला,"नीट ऐकून घेऊ म्हणजे काय? बोलणाऱ्याच्या तोंडाला कान लावू?' त्यावर तो सहकारी काहीच बोलला नाही. पुढे अनेक दिवस विजयचा घोर अपमान होत असताना "आजही नीट न ऐकल्यामुळेच!' याची तो सहकारी खात्री करून घेत असे.
मराठीतले एक नामवंत साहित्यिक पुण्यात राहत होते. त्यांच्या बाबतीतली एक गमतीदार गोष्ट आहे. काही दिवस ते आजारी होते. त्याच दरम्यान मुंबईचा एक पत्रकार पुण्यात आला होता. जाता जाता त्या साहित्यिकांना भेटण्यासाठी तो त्यांच्या घरी गेला. साहित्यिक घरी नव्हते. म्हणून त्याने शेजारी चौकशी केली. शेजारी म्हणाला,"ते गेले!' पत्रकाराने घाईघाईने मुंबई गाठली आणि "सुप्रसिद्ध साहित्यिक अमुकतमुक यांचे निधन' अशी बातमी छापून टाकली. गंमत म्हणजे "ते गेले!' असे सांगताना त्या शेजाऱ्याला "ते बाहेरगावी गेले' असे सांगायचे होते.
नीट बोलले पाहिजे, हे खरे पण दुसऱ्याने कसे बोलावे यावर आपले नियंत्रण नसते. म्हणून आपण नीट ऐकले पाहिजे.म्हणजे अशा जीवघेण्या गमतीजमती होणार नाहीत. बरे हे ऐकणे म्हणजे समोरच्याचे फक्त शब्दच ऐकणे नव्हे तर त्याचे म्हणणे ऐकणे होय. दरवेळी नुसते शब्द ऐकून बोलणाऱ्याला काय म्हणायचे आहे, हे समजून घेता येत नाही. त्यासाठी त्या शब्दांचा सूर त्यासोबत होणारी शरीराची हालचाल समजून घ्यायला हवी, "शहाणा आहेस!' हे एकच वाक्य आपण "शहाणे माझे बाळ ते!' आणि "मूर्ख कुठला!' अशा दोन्हीही अर्थाने वापरतो नाही का? "तो काल सकाळी कोल्हापूरहून आला.' हे एकच वाक्य माणूस कसा उच्चारतो त्याप्रमाणे बदलत जाते. समजा एखाद्याने "तो' वर जोर दिला तर त्याचा अर्थ "तो' आला "हा' आला नाही. एखाद्याने "काल'वर जोर दिला, तर "काल'आला, "आज' आला नाही. आणि "सकाळी'वर जोर दिला तर "सकाळी' आला "दुपारी' नव्हे असा अर्थ निघतो. "कोल्हापूर' आणि "आला' यावर जोर असेल तर अनुक्रमे मुंबई व दिल्लीवरून नव्हे तर "कोल्हापूर'हून आला आणि "गेला' नव्हे तर "आला' हे प्रामुख्याने सांगायचे असते.
आणखी एक गंमतीची गोष्ट अशी आहे. एका सकाळी एक पहेलवान जवळच्या टेकडीवर जाणाऱ्या रस्त्याने धावण्याचा व्यायाम करीत असतो, वाटेत त्याला एक माणूस गाडी दरीत ढकलत असल्याचे दिसते. त्या किरकोळ शरीरयष्टी असलेल्या माणसाला गाडी काही जागची हलत नाही. म्हणून हा पहेलवान जाता-जाता एक धक्का देतो, त्याबरोबर ती गाडी थेट दरीत जाऊन पडते. तो किरकोळ शरीरयष्टीचा माणूस "थॅंक्यू' म्हणेल म्हणून पुन्हा धावू लागलेला पहेलवान मागे पाहतो, तेव्हा तो किरकोळ शरीरयष्टीचा माणूस त्याला शिव्या घालत असतो असे का होते, हे माहीत आहे? कारण त्या पहेलवानाला ऐकण्याची कला अवगत झालेली नाही. तो किरकोळ शरीरयष्टीचा माणूस गाडी ढकलण्यासाठी प्रयत्न करीत नसतो तर गाडीच्या आधाराने व्यायाम करीत असतो. पहेलवानाने थोडे लक्षपूर्वक पाहिले असते तर त्या किरकोळ शरीरयष्टीच्या माणसाच्या पायातले जॉगिंग शूज, हाफ पॅण्ट आणि स्पोर्टस् टी-शर्टने हा माणूस व्यायाम करतो आहे, हे त्याला नेमके सांगितले असते, पण ऐकायची- नीट ऐकायची सवय नसल्याने अख्खी गाडी दरीत गेली.
आठवून बघा, तुम्ही कधी त्या विजयसारखे अपमानित झाला आहात? एखाद्याच्या जाण्याची भलतीच बातमी प्रसारित केली आहे? किंवा एखाद्याची गाडी अशीच दरीत ढकलून मोकळे झाला आहात? नाही म्हणू नका, जरा स्मरणशक्तीला ताण द्या. कधी ना कधी आपण ऐकण्याचा आळस करू मोठी चूक केलेली असते.
आता प्रश्न उरतो तो एकच- ही ऐकण्याची कला आत्मसात कशी करायची? उत्तर अगदी सोपे आहे. देवाने आपल्याला दोन कान दिले आहेत. ते आपण सैदव उघडे ठेवले पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या दोन कानांच्या मध्ये लक्ष ठेवायला हवे आणि मग तिथेच असलेले बुद्धी वापरून बोलणाऱ्या काय म्हणायचे आहे याचा नेमका अर्थ लावला पाहिजे. यासाठी पाच पैसेसुद्धा खर्च येत नाही. ईश्वराने या सर्व शक्ती आपल्याला मोफत दिल्या आहेत. आजपासूनच आपण ही ऐकण्याची कला अवगत करण्याचा प्रयत्न करूया!
-वैभव बळीराम चाळके
तिने चुंबिलेली लिलीची फुले
लिलीची फुले
तिने एकदा
चुंबिता, डोळां
पाणी मी पाहिले...!
लिलीची फुले
आता कधीहि
पाहता, डोळां
पाणी हे साकळे...!
ही पु.शि.रेगे यांची कविता आहे. अवघ्या आठ ओळींची. अवघ्या अठरा शब्दांची. पण तिच्यात मावणारा अवकाश फार मोठा आहे. म्हणूनच कदाचित ती कविता प्रथम वाचली तेव्हापासून मनात घर करून राहिली आहे.
ही कविता आहे डोळ्यांतल्या पाण्याची-अर्थात अश्रूंची-आसवांची! अश्रूंचे आपल्या जीवनातील स्थान फार मोठे आहे. डोळे डबडबले आहेत हे विधान डोळे ठार कोरडे झाले आहेत या विधानापेक्षा अधिक सुंदर आहे, नाही का? म्हणूनच तर साने गुरुजींनी आपल्या कवितेत "फक्त माझे अश्रू नको नेऊ देवा हाचि ठेव ठेवा जन्मभरी!' अशी प्रार्थना केली आहे. आणि चारोळीचा जनक चंद्रशेखर गोखले यांनी पुसणारं कोणी असेल तर डोळे भरून यायला अर्थ आहे, डोळे कुणाचे भरणार नसतील तर मरणही व्यर्थ आहे असं म्हटलं आहे.
वरील कविता आसवांशीच निगेेेडित आहे. माणसाला माणसापासून तोडणाऱ्या आणि माणसाला माणसाशी जोडणाऱ्या आसवांची कविता आहे ही.
कुणी तरी एक ती... लिलीची फुले हाती घेऊन उभी असते. कवी तिला पाहतो. पुढच्याच क्षणी ती हातातली लिलीच फुले चुंबून घेते. ती लिलीची फुले चुंबत असताना तिच्या डोळ्यांत पाणी उभे राहते. का? ते कवीला माहीत नाही. पण त्या लिलीच्या फुलांशी तिचं कुणीतरी माणूस जोडलेलं असणार. लिलीची फुले कधी तरी तिच्या प्रिय माणसाने तिला दिली असतील आणि आता तो नाही म्हणून तिच्या डोळ्यांत ही लिलीची फुले पाहून आसवं आली असतील. त्याच्या स्मृतीने उचंबळून येऊन तिने ही फुले चुंबली असतील किंवा असेच काही तरी...काही तरी खास आठवण त्या लिलीच्या फुलांशी जोडलेली आहे. म्हणून ती फुलं हाती घेतल्यावर चुंबावी वाटली आणि चुंबल्यावर डोळ्यांत पाणी आलं. कवीचा आणि तिचा काहीही पूर्वसंबंध नाही. तो ते एक दृश्य पाहतो एवढाच त्याचा तिच्याशी संबंध! पण तो कवी आहे. सुहृद आहे.( गंगाधर पाटलांनी पु.शि. रेगे यांच्या निवडक कविताचं सकलन केलं आहे, त्याचं नाव "सुहृदगाथा'असंच ठेवलं आहे.) त्यामुळे तिचे डोळे भरलेले पाहून तो तिच्या भावनांशी सहकंप पावतो. तिला तशी आसवांनी डबडबलेली पाहून त्याचंही मन भरून येतं.
पुढच्या चार ओळींत कवी सांगतो की, त्या घटनेचा परिणाम इतका खोल होता की आता कधीही, कुठेही लिलीची फुले दिसली की ती घटना आठवते आणि डोळ्यांत पाणी साकळू लागते. कवी एखाद्या प्रसन्न सकाळी बागेत जातो. अचानक सुंदर उमललेली लिली दिसते. त्याचा स्मृती जागृत होतात. पटकन डोळे भरून येतात. किंवा तो एखाद्या समारंभात जातो लिलीच फुले दिसतात, डोळ्यांत एकाएकी आसवं भरून येतात. त्याच्या संवेदनशील मनानं आणि आसवांनी त्या मुलीच्या आसवांशी आणि तिच्या अज्ञात कहाणीशी मोठे गोड भावबंध निर्माण केले आहेत. स्नेहसंबंधाचे एक हिरवे झाडच त्यांच्या आत रुजून आले आहे.
प्रथम वाचनात ही कविता पटकन कळत नाही. सोपी आहे तरी अवघड वाटते. कारण ती थेट काही न बोलता बरेच काही सुचवते. त्यात या कवितेची रचना थोडी आडवळणाची आहे. त्या आठ ओळींतील पहिल्या साधारण साडेतीन ओळीनंतर स्वल्पविराम येतो, तिथे थांबलात, "डोळां' शब्दातील "ळा' वर असलेला अनुस्वार म्हणजे डोळ्यांत हे समजून घेतलात( "कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबां गेलां' मध्ये "बा'वर अनुस्वार आहे, तो आदरार्थी अनेक वचनांवरचा आहे आणि तो "बाबांनो' असे सुचवतो.) आणि दुसऱ्या कडव्यातील "पाहता'नंतरचा स्वल्पविराम आणि पुन्हा "डोळां' वरील अनुस्वार समजून घेतलात तर कविता एकदम सोपी होत जाईल.
पु.शि. रेगे यांची कविता कळायला थोडे श्रम पडतात. पण कष्टाने कमावलेली भाकरी जो आनंद देते त्याला उपमा नाही. तुम्ही चांगल्या,े दर्जेदार कवितांच्या शोधात असाल आणि थोडे कष्ट करायची तयारी असेल तर पु.शि.रेगेंच्या कविता जरूर वाचा. तसे नसेल तर ही लिलीची फुले काही कमी महत्त्वाची नाहीत. गेली साधारण दहा-बारा वर्षे ती माझ्या ओंजळीत अगदी ताजीतवानी राहिली आहेत. त्यातली काही तुमच्या हाती देतो आहे. ती जपून ठेवा. कुणी रसिक भेटला तर त्यातली काही त्यासही द्या!!
-वैभव बळीराम चाळके
एका छोट्याशा कंपनीतील ही गोष्ट आहे. त्या कंपनीत साधारण 15-20 कर्मचारी काम करत होते. विजय हा त्यातीलच एक. बऱ्यापैकी हुशार. कामसू सदैव तत्पर असणारा, पण आठवड्यातून एकदा तरी त्याचे सर त्याला सर्वांसमोर झापायचे. मग तो जिव्हारी लागल्यासारखा तडफडायचा आणि "माणसाची किंमतच नाही! कोण मेहनत करतो ते दिसतच नाही! माझे नशीबच फुटके' असे काहीबाही बरळत राहायचा. पुन्हा दुसऱ्या दिवशी आपण कसे कामासाठी सदैव तत्पर असतो, हे दाखविण्यासाठी पुढेपुढे करू लागायचा. सरांचा कालचा राग जावा म्हणून आज प्रयत्न करू लागायचा. सरांनी एखादे काम सांगितले की, खूष होऊन ते उत्साहाने करायचा, परंतु त्यात हमखास चूक करून ठेवायचा आणि पुन्हा ओरडा खायचा.
कधी सर सांगायचे, "एक टेबल आणि दोन खुर्च्या हव्या आहेत आपल्याला, जरा किमती काढून ये.' दुसऱ्या दिवशी हा एखाद्या फर्निचर मालकालाच ऑफिसात हजर करायचा. त्या फर्निचरवाल्याला घरचा रस्ता दाखविल्यावर सर विजयला झापायचे, "तुला किमती काढायला सांगितल्या होत्या. फर्निचरवाल्याला बोलावून आणायला नव्हे.' मग याची बोलती बंद व्हायची. चेहरा कसनुसा व्हायचा. कधी सर सांगायचे, "तुझ्या घरच्या वाटेवर रद्दीवाला आहे ना, त्याला रद्दी घेऊन जायला सांग.' दुसऱ्या दिवशी रद्दीवाला दोन मुलांना घेऊन यायचा. सर रद्दीवाल्याला म्हणायचे,"ही दोन मुले कशाला घेऊन आला आहेस? दहा किलो तर रद्दी आहे अवघी!' तर तो म्हणायचा, " साहेब जुन्या खुर्च्या, टेबल आणि फॅन पण न्यायचा आहे ना?' "कोणी सांगितले तुला?' सर त्याच्यावर वैतागायचे. मग आपण त्याला उगाच बडबडतोय हे लक्षात येऊन, विजयला बोलावून त्या रद्दीवाल्यासमोर त्याची रद्दी करून टाकायचे. मग विजय संबंध दिवस वैतागत राहायचा. सायंकाळी सुटल्यावर तसाच वैतागत घरी जायचा आणि घरच्यांचीही सायंकाळ खराब करून टाकायचा.
आपल्या इज्जतीचे पार पोतेरे करून घेतले होते त्याने. त्याची चूक एकच होती- त्याला ऐकण्याची कला अवगत नव्हती. म्हणजे त्याला दोन कान होते, ते दोन्ही कान तांत्रिकदृष्ट्या सक्षम होते. पण ऐकणे- उत्तम ऐकणे ही एक कला आहे याची त्याला जाणीव नव्हती. तो कोणाचेही संपूर्ण ऐकत नसे. संपूर्ण लक्ष देऊन तर त्याने कधीच काही ऐकलेले नाही. त्याचा दोष हा एवढाच होता. पण तोच फार मोठा होता. त्याच्या एका सहकाऱ्याने त्याला हे सांगण्याचा एक-दोनदा प्रयत्न केला, तर तो त्या सहकाऱ्यावरच वैतागला आणि म्हणाला,"नीट ऐकून घेऊ म्हणजे काय? बोलणाऱ्याच्या तोंडाला कान लावू?' त्यावर तो सहकारी काहीच बोलला नाही. पुढे अनेक दिवस विजयचा घोर अपमान होत असताना "आजही नीट न ऐकल्यामुळेच!' याची तो सहकारी खात्री करून घेत असे.
मराठीतले एक नामवंत साहित्यिक पुण्यात राहत होते. त्यांच्या बाबतीतली एक गमतीदार गोष्ट आहे. काही दिवस ते आजारी होते. त्याच दरम्यान मुंबईचा एक पत्रकार पुण्यात आला होता. जाता जाता त्या साहित्यिकांना भेटण्यासाठी तो त्यांच्या घरी गेला. साहित्यिक घरी नव्हते. म्हणून त्याने शेजारी चौकशी केली. शेजारी म्हणाला,"ते गेले!' पत्रकाराने घाईघाईने मुंबई गाठली आणि "सुप्रसिद्ध साहित्यिक अमुकतमुक यांचे निधन' अशी बातमी छापून टाकली. गंमत म्हणजे "ते गेले!' असे सांगताना त्या शेजाऱ्याला "ते बाहेरगावी गेले' असे सांगायचे होते.
नीट बोलले पाहिजे, हे खरे पण दुसऱ्याने कसे बोलावे यावर आपले नियंत्रण नसते. म्हणून आपण नीट ऐकले पाहिजे.म्हणजे अशा जीवघेण्या गमतीजमती होणार नाहीत. बरे हे ऐकणे म्हणजे समोरच्याचे फक्त शब्दच ऐकणे नव्हे तर त्याचे म्हणणे ऐकणे होय. दरवेळी नुसते शब्द ऐकून बोलणाऱ्याला काय म्हणायचे आहे, हे समजून घेता येत नाही. त्यासाठी त्या शब्दांचा सूर त्यासोबत होणारी शरीराची हालचाल समजून घ्यायला हवी, "शहाणा आहेस!' हे एकच वाक्य आपण "शहाणे माझे बाळ ते!' आणि "मूर्ख कुठला!' अशा दोन्हीही अर्थाने वापरतो नाही का? "तो काल सकाळी कोल्हापूरहून आला.' हे एकच वाक्य माणूस कसा उच्चारतो त्याप्रमाणे बदलत जाते. समजा एखाद्याने "तो' वर जोर दिला तर त्याचा अर्थ "तो' आला "हा' आला नाही. एखाद्याने "काल'वर जोर दिला, तर "काल'आला, "आज' आला नाही. आणि "सकाळी'वर जोर दिला तर "सकाळी' आला "दुपारी' नव्हे असा अर्थ निघतो. "कोल्हापूर' आणि "आला' यावर जोर असेल तर अनुक्रमे मुंबई व दिल्लीवरून नव्हे तर "कोल्हापूर'हून आला आणि "गेला' नव्हे तर "आला' हे प्रामुख्याने सांगायचे असते.
आणखी एक गंमतीची गोष्ट अशी आहे. एका सकाळी एक पहेलवान जवळच्या टेकडीवर जाणाऱ्या रस्त्याने धावण्याचा व्यायाम करीत असतो, वाटेत त्याला एक माणूस गाडी दरीत ढकलत असल्याचे दिसते. त्या किरकोळ शरीरयष्टी असलेल्या माणसाला गाडी काही जागची हलत नाही. म्हणून हा पहेलवान जाता-जाता एक धक्का देतो, त्याबरोबर ती गाडी थेट दरीत जाऊन पडते. तो किरकोळ शरीरयष्टीचा माणूस "थॅंक्यू' म्हणेल म्हणून पुन्हा धावू लागलेला पहेलवान मागे पाहतो, तेव्हा तो किरकोळ शरीरयष्टीचा माणूस त्याला शिव्या घालत असतो असे का होते, हे माहीत आहे? कारण त्या पहेलवानाला ऐकण्याची कला अवगत झालेली नाही. तो किरकोळ शरीरयष्टीचा माणूस गाडी ढकलण्यासाठी प्रयत्न करीत नसतो तर गाडीच्या आधाराने व्यायाम करीत असतो. पहेलवानाने थोडे लक्षपूर्वक पाहिले असते तर त्या किरकोळ शरीरयष्टीच्या माणसाच्या पायातले जॉगिंग शूज, हाफ पॅण्ट आणि स्पोर्टस् टी-शर्टने हा माणूस व्यायाम करतो आहे, हे त्याला नेमके सांगितले असते, पण ऐकायची- नीट ऐकायची सवय नसल्याने अख्खी गाडी दरीत गेली.
आठवून बघा, तुम्ही कधी त्या विजयसारखे अपमानित झाला आहात? एखाद्याच्या जाण्याची भलतीच बातमी प्रसारित केली आहे? किंवा एखाद्याची गाडी अशीच दरीत ढकलून मोकळे झाला आहात? नाही म्हणू नका, जरा स्मरणशक्तीला ताण द्या. कधी ना कधी आपण ऐकण्याचा आळस करू मोठी चूक केलेली असते.
आता प्रश्न उरतो तो एकच- ही ऐकण्याची कला आत्मसात कशी करायची? उत्तर अगदी सोपे आहे. देवाने आपल्याला दोन कान दिले आहेत. ते आपण सैदव उघडे ठेवले पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या दोन कानांच्या मध्ये लक्ष ठेवायला हवे आणि मग तिथेच असलेले बुद्धी वापरून बोलणाऱ्या काय म्हणायचे आहे याचा नेमका अर्थ लावला पाहिजे. यासाठी पाच पैसेसुद्धा खर्च येत नाही. ईश्वराने या सर्व शक्ती आपल्याला मोफत दिल्या आहेत. आजपासूनच आपण ही ऐकण्याची कला अवगत करण्याचा प्रयत्न करूया!
-वैभव बळीराम चाळके
तिने चुंबिलेली लिलीची फुले
लिलीची फुले
तिने एकदा
चुंबिता, डोळां
पाणी मी पाहिले...!
लिलीची फुले
आता कधीहि
पाहता, डोळां
पाणी हे साकळे...!
ही पु.शि.रेगे यांची कविता आहे. अवघ्या आठ ओळींची. अवघ्या अठरा शब्दांची. पण तिच्यात मावणारा अवकाश फार मोठा आहे. म्हणूनच कदाचित ती कविता प्रथम वाचली तेव्हापासून मनात घर करून राहिली आहे.
ही कविता आहे डोळ्यांतल्या पाण्याची-अर्थात अश्रूंची-आसवांची! अश्रूंचे आपल्या जीवनातील स्थान फार मोठे आहे. डोळे डबडबले आहेत हे विधान डोळे ठार कोरडे झाले आहेत या विधानापेक्षा अधिक सुंदर आहे, नाही का? म्हणूनच तर साने गुरुजींनी आपल्या कवितेत "फक्त माझे अश्रू नको नेऊ देवा हाचि ठेव ठेवा जन्मभरी!' अशी प्रार्थना केली आहे. आणि चारोळीचा जनक चंद्रशेखर गोखले यांनी पुसणारं कोणी असेल तर डोळे भरून यायला अर्थ आहे, डोळे कुणाचे भरणार नसतील तर मरणही व्यर्थ आहे असं म्हटलं आहे.
वरील कविता आसवांशीच निगेेेडित आहे. माणसाला माणसापासून तोडणाऱ्या आणि माणसाला माणसाशी जोडणाऱ्या आसवांची कविता आहे ही.
कुणी तरी एक ती... लिलीची फुले हाती घेऊन उभी असते. कवी तिला पाहतो. पुढच्याच क्षणी ती हातातली लिलीच फुले चुंबून घेते. ती लिलीची फुले चुंबत असताना तिच्या डोळ्यांत पाणी उभे राहते. का? ते कवीला माहीत नाही. पण त्या लिलीच्या फुलांशी तिचं कुणीतरी माणूस जोडलेलं असणार. लिलीची फुले कधी तरी तिच्या प्रिय माणसाने तिला दिली असतील आणि आता तो नाही म्हणून तिच्या डोळ्यांत ही लिलीची फुले पाहून आसवं आली असतील. त्याच्या स्मृतीने उचंबळून येऊन तिने ही फुले चुंबली असतील किंवा असेच काही तरी...काही तरी खास आठवण त्या लिलीच्या फुलांशी जोडलेली आहे. म्हणून ती फुलं हाती घेतल्यावर चुंबावी वाटली आणि चुंबल्यावर डोळ्यांत पाणी आलं. कवीचा आणि तिचा काहीही पूर्वसंबंध नाही. तो ते एक दृश्य पाहतो एवढाच त्याचा तिच्याशी संबंध! पण तो कवी आहे. सुहृद आहे.( गंगाधर पाटलांनी पु.शि. रेगे यांच्या निवडक कविताचं सकलन केलं आहे, त्याचं नाव "सुहृदगाथा'असंच ठेवलं आहे.) त्यामुळे तिचे डोळे भरलेले पाहून तो तिच्या भावनांशी सहकंप पावतो. तिला तशी आसवांनी डबडबलेली पाहून त्याचंही मन भरून येतं.
पुढच्या चार ओळींत कवी सांगतो की, त्या घटनेचा परिणाम इतका खोल होता की आता कधीही, कुठेही लिलीची फुले दिसली की ती घटना आठवते आणि डोळ्यांत पाणी साकळू लागते. कवी एखाद्या प्रसन्न सकाळी बागेत जातो. अचानक सुंदर उमललेली लिली दिसते. त्याचा स्मृती जागृत होतात. पटकन डोळे भरून येतात. किंवा तो एखाद्या समारंभात जातो लिलीच फुले दिसतात, डोळ्यांत एकाएकी आसवं भरून येतात. त्याच्या संवेदनशील मनानं आणि आसवांनी त्या मुलीच्या आसवांशी आणि तिच्या अज्ञात कहाणीशी मोठे गोड भावबंध निर्माण केले आहेत. स्नेहसंबंधाचे एक हिरवे झाडच त्यांच्या आत रुजून आले आहे.
प्रथम वाचनात ही कविता पटकन कळत नाही. सोपी आहे तरी अवघड वाटते. कारण ती थेट काही न बोलता बरेच काही सुचवते. त्यात या कवितेची रचना थोडी आडवळणाची आहे. त्या आठ ओळींतील पहिल्या साधारण साडेतीन ओळीनंतर स्वल्पविराम येतो, तिथे थांबलात, "डोळां' शब्दातील "ळा' वर असलेला अनुस्वार म्हणजे डोळ्यांत हे समजून घेतलात( "कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबां गेलां' मध्ये "बा'वर अनुस्वार आहे, तो आदरार्थी अनेक वचनांवरचा आहे आणि तो "बाबांनो' असे सुचवतो.) आणि दुसऱ्या कडव्यातील "पाहता'नंतरचा स्वल्पविराम आणि पुन्हा "डोळां' वरील अनुस्वार समजून घेतलात तर कविता एकदम सोपी होत जाईल.
पु.शि. रेगे यांची कविता कळायला थोडे श्रम पडतात. पण कष्टाने कमावलेली भाकरी जो आनंद देते त्याला उपमा नाही. तुम्ही चांगल्या,े दर्जेदार कवितांच्या शोधात असाल आणि थोडे कष्ट करायची तयारी असेल तर पु.शि.रेगेंच्या कविता जरूर वाचा. तसे नसेल तर ही लिलीची फुले काही कमी महत्त्वाची नाहीत. गेली साधारण दहा-बारा वर्षे ती माझ्या ओंजळीत अगदी ताजीतवानी राहिली आहेत. त्यातली काही तुमच्या हाती देतो आहे. ती जपून ठेवा. कुणी रसिक भेटला तर त्यातली काही त्यासही द्या!!
-वैभव बळीराम चाळके
मुंग्या
मुंग्या
सखाराम अण्णाच्या घरावर सूर्य चढला की त्याची किरणं थेट खिडकीतून अजय झोपतो त्या खाटेवर येत. त्या चटक्याने अजय उठे आणि डोळे चोळत आंघोळीला निघे. आजही त्याच चटक्याने त्याला जागा आली. तो उठला आणि आंघोळीला निघाला.
शाळेला अभ्यासाची सुट्टी होती. दहावीची परीक्षा संपली म्हणजे नववीची सुरू होणार होती. अजय झेपेल तेवढा अभ्यास करी आणि कंटाळा आला म्हणजे गावात चक्कर मारून येई.
भाजावळीचे दिवस होते. गावाच्या आसपास सर्वत्र लोक भाजावळीच्या कामात दंग होते. दिवसभर एकेक तरवा भाजवळीसाठी तयार केला जाई आणि मग पहाटे पाचला उठून लोक तरव्यावर माती लावायला जात. यंदा नववीचा अभ्यास असल्याने अजयचे आईवडील त्याला घेऊन जात नव्हते. पण गेल्या वर्षापर्यंत तो आवर्जून जाई. सकाळी साधारण साडेसहा -सातपर्यंत माती खणून बारीक करून तरव्यावर पसरली जाई आणि तरव्याला पेट दिला जाई. म्हणता म्हणता आग भडके-धुराचे हत्ती आभाळाच्या दिशेने पळू लागत.
अजय उठला. घरामागच्या मोरीत जाऊन त्याने आंघोळ केली आणि भाजीभाकरी खाऊन तो अभ्यासाला बसला. वारं सुटल होतं आणि शेतं आगीनं पेटली होती. त्यामुळे गावावर आगीच्या झळा दौडत जात होत्या. घरात फारच गरम होतं म्हणून अजयने अभ्यासाचं गाईड घेतलं, घराला कडी मारली आणि तो आमटोऱ्याच्या सावलीत येऊन बसला. आमटोरा हे आंब्याचं झाड. त्याची फळं फार आंबट होती. ती कोणी तोंडातही घेत नसे, पण त्याची सावली मात्र एकदम गडद पडत असे. अजय परीक्षेच्या काळात इथेच अभ्यास करीत बसे.
आजही तो येऊन तिथल्या नेहमीच्या पाथरीवर बसला. अधूनमधून येणारे उष्ण वारे वगळता इथं थंड वातावरण होतं. म्हणूनच तो सुखावला होता. पण एका क्षणी तो धडपडत उठला. त्याचा हात प्रतिक्षिप्त क्रियेने कुल्ल्याकडे गेला होता. तोंडाने बोंबलत आणि कुल्यावर हात घासत तो वेडावाकडा नाचू लागला. वेदनेनं हैराण होत तो पुढची दोनचार मिनिटे तसाच कळवळत राहिला. त्याला लाला मुंगीने दंश केला होता. एकसारखा यग मारत होता. जरा वेदना शांत झाल्यावर त्याने ती मुंगी शोधून काढली आणि तिथल्याच एका दगडाने तिचा चेंदामेंदा केला. तिच्या अस्तित्वाची फक्त एक रेघ पाथरीवर राहिली.
अजयचे अभ्यासातून लक्ष उडाले. त्याला लहानपणीची आठवण आली- पाचवीत असताना एकदा हरे अभ्यासाला आलो तेव्हा अशाच एका मुंगीने मांडीवर चावा घेतला होता आणि वेदनेने कळवळत घरी जाताना आपण ढोपर फोडून घेतलं होतं. त्याला त्या मुंग्यांचा राग आला.
"आपण कळायला लागल्यापासून पाहतोय या आमटोऱ्याच्या मागच्या चिवारीच्या बाजूला या लालमुंग्यांची वारुळं आहेत. वारुळं नव्हे, साम्राज्याच आहे त्यांचं. त्या एरवी कुणाला त्रास देत नाहीत तरी एखाद्याला चावल्या म्हणजे तो असा एकदम फुगडी घालू लागतो.
"आपण यांचा बंदोबस्त केलाच पाहिजे-' अजय मनाशीच बोलत होता.
दुसऱ्या दिवशी आईबाबा सकाळी भाजावळीसाठी बाहेर पडून गेले. उन्हं खाटेवर आली तसा अजय उठला. तोंडही न धुता तो काडीेपेटी खिशात टाकून घराला कडी मारून घराबाहेर पडला. गोठ्याच्या शेजारी गवताच्या वरंडी रचून ठेवल्या होत्या. त्यातली एक वरंड त्याने डोक्यावर घेतली.आमटोऱ्याच्या पाथरीवर त्याने वरंड उतरवून ठेवली. पुन्हा घरी जाऊन खोपीतली भाराभर लाकडे बांधून घेऊन आला.
आता त्याने त्या लालमुंग्यांच्या वारुळांभोवती गवताची एकेक पेंडी रचून गवताची तटबंदी उभारली. त्या पेंड्यांनी पेट घेताच वाऱ्यावर त्या उडून जाऊ नयेत म्हणून त्याने त्यावर लाकडे रचली. एकदम कडेकोट बंदोबस्त केला गेला. त्याला इतिहासातला पाठ आठवला, पुरंदर किल्ल्याला मुघल फौजेने वेढा घातला... आता एकही मुंगी जिवंत राहणे शक्य नाही! तो मनातल्या मनात म्हणाला. मग काडेपेटी काढून त्याने शिल्लक राहिलेल्या पेंड्यांमधली एक पेंडी पेटवली आणि त्या पेंडीने वारुळांभोवती रचलेल्या गवताच्या तटबंधीला आग लावली. सारीकडून गवत भरभरून पेटले. आतल्या मुंग्यांची कोण धावपळ झाली. असंख्य मुंग्या वारुळांतून बाहेर आल्या. प्रचंड वेगाने त्या सैरावैरा पळू लागल्या आणि शेकड्याच्या संख्येने जळून करपून मरू लागल्या. अजयला आता चेव चढला. त्याने उरलेल्या पेंड्या त्या वारुळांवर टाकल्या. आता त्याला त्यांचं सैरावरा पळणं पाहण्याची गरज उरली नाही. त्याला आता फक्त वारुळं, मुंग्या, गवत आणि लाकडाची राख उरलेली पाहायची होती.
हजारो मुंग्या मृत्युमुखी पडल्या. मघापासून गवताचा वास येत होता. आता त्या वासापेक्षा करपलेल्या मुंग्यांचा वास अधिक गडद झाला.
अजयच्या कुल्यावरच्या वेदना कमी कमी होत शांत झाल्या.
दुपारी आईवडील घरी परतले तेव्हा त्यांना हा सारा प्रकार समजला. वडील काही बोलले नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर ताण तेवढा दिसू लागला. पण आई करवादली, "काय केलंस हे गुलामा? देवाच्या मुंग्या होत्या त्या! सात पिढ्यांपासून आहेत तिथं. कुणाची हिंमत आली नाही त्यांना हात लावायची? आणि तू आज त्यांची राख रांगोळी केलीस! देव कोपला म्हंजी रं! काय ही अवदसा सुचली तुला?' आणि मग आवाजाची पट्टी बदलत आई हात जोडून म्हणाली, "संभाळ रं देवा माझ्या लेकरला. हातून चूक झाली आसल! लहान लेकरू हाय त्याला माफ कर!
आपण काही चूक केली आहे असं त्याला आतापर्यंत वाटत नव्हतं. पण आई रागवल्यावर आणि विशेषतः तिने देवाला साकडं घातल्यावर अजय घाबरला. आपण काही तरी अक्षम्य पाप केलं आहे आणि त्याची फळं आता आपल्याला भोगावी लागणार आहेत असं त्याला वाटू लागलं. आई देवापुढं पदर पसरत होती. अजयच्या नावानं शिव्या हासडत होती. मग अजयही मनातल्या मनात देवाला सॉरी म्हणाला. आई खूप खूप वैतागली आणि मग त्याला जवळ घेऊन रडरड रडली.
नेहमीप्रमाणे रात्री नऊला सगळे जण झोपी गेले. अजय एकटाच अभ्यास करत जागत होता. पण आज त्याचं मनच लागेना. त्याला तो दुपारचा प्रसंग पुन्हापुन्हा आठवत होता. मनात अनामिक भीती सळसळत होती. शेवटी साडेनऊला तो आपल्या खाटेवर झोपायला गेला.
आणि रात्री अकराच्या सुमारास...
"आई ग! हट... हट...' असा आवाज करीत तो उठला त्याच्या आवाजाबरोबर आई आणि बाबाही उठले. अंधारातच दोघे खाटेजवळ आले. अजय उठला होता, पण त्याचे डोळे मिटलेलेच होते. तो हातपाय झाडत होता. आणि अंगावरच्या मुंग्या झाडत होता. त्याच्या सर्वांगाला हजारो मुंग्या दंश करीत होत्या. वडिलांनी त्याचा हात धरला तर त्याने त्यांना भिरकावून दिले. आई "अजू, बाळा अजू' करीत त्याला समजवू पाहत होती. पण अजू शुध्दीवर नव्हताच मुळी! तो त्या हजार मुंग्यांच्या दंशांनी हैराण झाला होता. कधी तोंडावरून हात फिरवत होता. कधी पाठीवर तर कधी पायांवर! त्याने त्याच वेगाने शर्ट काढून फेकला. बरमोडा उतरवला. तरी हजारो मुंग्या त्याच्या अंगावर होत्याच्या तो त्यांना शिव्या पालत अगतिक होत धडपडत होता. फार केविलपणा झाला होता तो. आई त्याच्या जवळ गेली. पण त्याने तिला हिसकावून लावले. काय करावे ते कळेना तिला. इतक्यात तिच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. आणि विजेच्या वेगाने पुढे होत तिने होती नव्हती ताकद एकवटून त्याच्या कानफटात लागावली!
एकदम झालेल्या त्या आघाताने तो खडबडून जागा झाला आणि धडपडत आईकडे केविलवाण्या नजरेने पाहत राहिला. अंगावर एकही मुंगी नाही हे पाहून तो सुखावला . पण भीतीने अंग थरथरत होते.
क्षणभर विसावलेली आई पुन्हा विसकटली..
"मुडदा बसविला रं सात पिड्यांचा परपंरेचा! अजाण लेकरू त्याला दोनदा चावताना लाज नाय वाटली. मला न्या तुम्हाला रक्ताचीच भूक लागली असेल तर. माझ्या पोराला पुन्हा शिवायच नाय! जाळून टाकीन... समदं घरदार... गाव जाळून टाकीन सगळं...'
- वैभव बळीराम चाळके
सखाराम अण्णाच्या घरावर सूर्य चढला की त्याची किरणं थेट खिडकीतून अजय झोपतो त्या खाटेवर येत. त्या चटक्याने अजय उठे आणि डोळे चोळत आंघोळीला निघे. आजही त्याच चटक्याने त्याला जागा आली. तो उठला आणि आंघोळीला निघाला.
शाळेला अभ्यासाची सुट्टी होती. दहावीची परीक्षा संपली म्हणजे नववीची सुरू होणार होती. अजय झेपेल तेवढा अभ्यास करी आणि कंटाळा आला म्हणजे गावात चक्कर मारून येई.
भाजावळीचे दिवस होते. गावाच्या आसपास सर्वत्र लोक भाजावळीच्या कामात दंग होते. दिवसभर एकेक तरवा भाजवळीसाठी तयार केला जाई आणि मग पहाटे पाचला उठून लोक तरव्यावर माती लावायला जात. यंदा नववीचा अभ्यास असल्याने अजयचे आईवडील त्याला घेऊन जात नव्हते. पण गेल्या वर्षापर्यंत तो आवर्जून जाई. सकाळी साधारण साडेसहा -सातपर्यंत माती खणून बारीक करून तरव्यावर पसरली जाई आणि तरव्याला पेट दिला जाई. म्हणता म्हणता आग भडके-धुराचे हत्ती आभाळाच्या दिशेने पळू लागत.
अजय उठला. घरामागच्या मोरीत जाऊन त्याने आंघोळ केली आणि भाजीभाकरी खाऊन तो अभ्यासाला बसला. वारं सुटल होतं आणि शेतं आगीनं पेटली होती. त्यामुळे गावावर आगीच्या झळा दौडत जात होत्या. घरात फारच गरम होतं म्हणून अजयने अभ्यासाचं गाईड घेतलं, घराला कडी मारली आणि तो आमटोऱ्याच्या सावलीत येऊन बसला. आमटोरा हे आंब्याचं झाड. त्याची फळं फार आंबट होती. ती कोणी तोंडातही घेत नसे, पण त्याची सावली मात्र एकदम गडद पडत असे. अजय परीक्षेच्या काळात इथेच अभ्यास करीत बसे.
आजही तो येऊन तिथल्या नेहमीच्या पाथरीवर बसला. अधूनमधून येणारे उष्ण वारे वगळता इथं थंड वातावरण होतं. म्हणूनच तो सुखावला होता. पण एका क्षणी तो धडपडत उठला. त्याचा हात प्रतिक्षिप्त क्रियेने कुल्ल्याकडे गेला होता. तोंडाने बोंबलत आणि कुल्यावर हात घासत तो वेडावाकडा नाचू लागला. वेदनेनं हैराण होत तो पुढची दोनचार मिनिटे तसाच कळवळत राहिला. त्याला लाला मुंगीने दंश केला होता. एकसारखा यग मारत होता. जरा वेदना शांत झाल्यावर त्याने ती मुंगी शोधून काढली आणि तिथल्याच एका दगडाने तिचा चेंदामेंदा केला. तिच्या अस्तित्वाची फक्त एक रेघ पाथरीवर राहिली.
अजयचे अभ्यासातून लक्ष उडाले. त्याला लहानपणीची आठवण आली- पाचवीत असताना एकदा हरे अभ्यासाला आलो तेव्हा अशाच एका मुंगीने मांडीवर चावा घेतला होता आणि वेदनेने कळवळत घरी जाताना आपण ढोपर फोडून घेतलं होतं. त्याला त्या मुंग्यांचा राग आला.
"आपण कळायला लागल्यापासून पाहतोय या आमटोऱ्याच्या मागच्या चिवारीच्या बाजूला या लालमुंग्यांची वारुळं आहेत. वारुळं नव्हे, साम्राज्याच आहे त्यांचं. त्या एरवी कुणाला त्रास देत नाहीत तरी एखाद्याला चावल्या म्हणजे तो असा एकदम फुगडी घालू लागतो.
"आपण यांचा बंदोबस्त केलाच पाहिजे-' अजय मनाशीच बोलत होता.
दुसऱ्या दिवशी आईबाबा सकाळी भाजावळीसाठी बाहेर पडून गेले. उन्हं खाटेवर आली तसा अजय उठला. तोंडही न धुता तो काडीेपेटी खिशात टाकून घराला कडी मारून घराबाहेर पडला. गोठ्याच्या शेजारी गवताच्या वरंडी रचून ठेवल्या होत्या. त्यातली एक वरंड त्याने डोक्यावर घेतली.आमटोऱ्याच्या पाथरीवर त्याने वरंड उतरवून ठेवली. पुन्हा घरी जाऊन खोपीतली भाराभर लाकडे बांधून घेऊन आला.
आता त्याने त्या लालमुंग्यांच्या वारुळांभोवती गवताची एकेक पेंडी रचून गवताची तटबंदी उभारली. त्या पेंड्यांनी पेट घेताच वाऱ्यावर त्या उडून जाऊ नयेत म्हणून त्याने त्यावर लाकडे रचली. एकदम कडेकोट बंदोबस्त केला गेला. त्याला इतिहासातला पाठ आठवला, पुरंदर किल्ल्याला मुघल फौजेने वेढा घातला... आता एकही मुंगी जिवंत राहणे शक्य नाही! तो मनातल्या मनात म्हणाला. मग काडेपेटी काढून त्याने शिल्लक राहिलेल्या पेंड्यांमधली एक पेंडी पेटवली आणि त्या पेंडीने वारुळांभोवती रचलेल्या गवताच्या तटबंधीला आग लावली. सारीकडून गवत भरभरून पेटले. आतल्या मुंग्यांची कोण धावपळ झाली. असंख्य मुंग्या वारुळांतून बाहेर आल्या. प्रचंड वेगाने त्या सैरावैरा पळू लागल्या आणि शेकड्याच्या संख्येने जळून करपून मरू लागल्या. अजयला आता चेव चढला. त्याने उरलेल्या पेंड्या त्या वारुळांवर टाकल्या. आता त्याला त्यांचं सैरावरा पळणं पाहण्याची गरज उरली नाही. त्याला आता फक्त वारुळं, मुंग्या, गवत आणि लाकडाची राख उरलेली पाहायची होती.
हजारो मुंग्या मृत्युमुखी पडल्या. मघापासून गवताचा वास येत होता. आता त्या वासापेक्षा करपलेल्या मुंग्यांचा वास अधिक गडद झाला.
अजयच्या कुल्यावरच्या वेदना कमी कमी होत शांत झाल्या.
दुपारी आईवडील घरी परतले तेव्हा त्यांना हा सारा प्रकार समजला. वडील काही बोलले नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर ताण तेवढा दिसू लागला. पण आई करवादली, "काय केलंस हे गुलामा? देवाच्या मुंग्या होत्या त्या! सात पिढ्यांपासून आहेत तिथं. कुणाची हिंमत आली नाही त्यांना हात लावायची? आणि तू आज त्यांची राख रांगोळी केलीस! देव कोपला म्हंजी रं! काय ही अवदसा सुचली तुला?' आणि मग आवाजाची पट्टी बदलत आई हात जोडून म्हणाली, "संभाळ रं देवा माझ्या लेकरला. हातून चूक झाली आसल! लहान लेकरू हाय त्याला माफ कर!
आपण काही चूक केली आहे असं त्याला आतापर्यंत वाटत नव्हतं. पण आई रागवल्यावर आणि विशेषतः तिने देवाला साकडं घातल्यावर अजय घाबरला. आपण काही तरी अक्षम्य पाप केलं आहे आणि त्याची फळं आता आपल्याला भोगावी लागणार आहेत असं त्याला वाटू लागलं. आई देवापुढं पदर पसरत होती. अजयच्या नावानं शिव्या हासडत होती. मग अजयही मनातल्या मनात देवाला सॉरी म्हणाला. आई खूप खूप वैतागली आणि मग त्याला जवळ घेऊन रडरड रडली.
नेहमीप्रमाणे रात्री नऊला सगळे जण झोपी गेले. अजय एकटाच अभ्यास करत जागत होता. पण आज त्याचं मनच लागेना. त्याला तो दुपारचा प्रसंग पुन्हापुन्हा आठवत होता. मनात अनामिक भीती सळसळत होती. शेवटी साडेनऊला तो आपल्या खाटेवर झोपायला गेला.
आणि रात्री अकराच्या सुमारास...
"आई ग! हट... हट...' असा आवाज करीत तो उठला त्याच्या आवाजाबरोबर आई आणि बाबाही उठले. अंधारातच दोघे खाटेजवळ आले. अजय उठला होता, पण त्याचे डोळे मिटलेलेच होते. तो हातपाय झाडत होता. आणि अंगावरच्या मुंग्या झाडत होता. त्याच्या सर्वांगाला हजारो मुंग्या दंश करीत होत्या. वडिलांनी त्याचा हात धरला तर त्याने त्यांना भिरकावून दिले. आई "अजू, बाळा अजू' करीत त्याला समजवू पाहत होती. पण अजू शुध्दीवर नव्हताच मुळी! तो त्या हजार मुंग्यांच्या दंशांनी हैराण झाला होता. कधी तोंडावरून हात फिरवत होता. कधी पाठीवर तर कधी पायांवर! त्याने त्याच वेगाने शर्ट काढून फेकला. बरमोडा उतरवला. तरी हजारो मुंग्या त्याच्या अंगावर होत्याच्या तो त्यांना शिव्या पालत अगतिक होत धडपडत होता. फार केविलपणा झाला होता तो. आई त्याच्या जवळ गेली. पण त्याने तिला हिसकावून लावले. काय करावे ते कळेना तिला. इतक्यात तिच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. आणि विजेच्या वेगाने पुढे होत तिने होती नव्हती ताकद एकवटून त्याच्या कानफटात लागावली!
एकदम झालेल्या त्या आघाताने तो खडबडून जागा झाला आणि धडपडत आईकडे केविलवाण्या नजरेने पाहत राहिला. अंगावर एकही मुंगी नाही हे पाहून तो सुखावला . पण भीतीने अंग थरथरत होते.
क्षणभर विसावलेली आई पुन्हा विसकटली..
"मुडदा बसविला रं सात पिड्यांचा परपंरेचा! अजाण लेकरू त्याला दोनदा चावताना लाज नाय वाटली. मला न्या तुम्हाला रक्ताचीच भूक लागली असेल तर. माझ्या पोराला पुन्हा शिवायच नाय! जाळून टाकीन... समदं घरदार... गाव जाळून टाकीन सगळं...'
- वैभव बळीराम चाळके
Subscribe to:
Posts (Atom)