Monday, January 20, 2020



कुठे वाजला पावा ग?

(सुवर्णसुत वैभव बळीराम चाळके 9702723652 )


त्याचं तिचं बोलगाणं

माझं गाणं प्रिये तुला गाता यायला हवं
आणि तुझ्या गाण्यात मला न्हाता यायला हवं

एक गाणं लिहीन मी चंद्र सूर्य तार्‍यावर
एक गाणं लिहिणे पानं-फुलं वाऱ्यावर
ताऱ्याचं गाणं म्हणताना तारा व्हायचं
वाऱ्याचं गाणं म्हणताना वारा व्हायचं
वार्यासंगे दूरदूर जाता यायला हवं

एक गाणं गोजिरवाणं लिहीन मी तुझ्यावर
एक गाणं आनंदानं लिहीन तुझ्या राजावर
राजालाही राणीसंगे गाता यायला हवं
राणीलाही राजासंगे न्हाता यायला हवं
गाण्यासंगे गाण्याला एक होता यायला हवं

एक गाणं शब्दाविना नुसते नुसते सुर
एक गाणं ज्याच्यामधून सूरसुद्धा दूर
शब्दांच्याही पलीकडचे दिसू लागते काही
अब्दअब्द मनातले साकार रूप घेई
गाणं सगळेच ऐकतात गाणं पाहता यायला हवं
(
सुवर्णसुत वैभव बळीराम चाळके )

युगामागुनी युगे निघून गेलीपण राधाकृष्णाची प्रीतकथा आजही प्रत्येक भारतीयाने ह्रदयकप्प्यात जपून ठेवली आहे. राधाकृष्ण हा इतिहास असेल किंवा कुण्या कवीला पडलेले ते गोड काव्यस्वप्न... पण एवढसं बी युगानुयुगे अनेक कलावंत शिंपत आले आहेत.
आणि म्हणूनच तर राधाकृष्ण ही रूपकवेल हर रसिकाच्या मनात रूजले... बहरलेय... ती बहरलेय तरी तिचं बहरणं थांबलेलं नाही. ती सदाफुली आहे... सतत फुलत राहणारी. राधाकृष्ण हे रूपक आहे स्त्री-पुरुष नात्याचा... त्यांच्यातल्या प्रेमसंबंधात... त्यांच्या गोड मिलनाची.  ही कथा आहे उमलण्याची... फुलण्याची... बहरण्याची... आणि वाऱ्यावर मनसोक्त हिंदळण्याची.. पण ही कथा म्हणजे नुसताच गोडवा नाही... या नितांत सुंदर कथेला दुःखाची भरजरी किनार आहे. ज्यांना हे भरजरी दुःखं अनुभवता येतं त्या सगळ्यांच्या आयुष्याला राधाकृष्णाचा परिसस्पर्श होऊन जातो. मग कधीतरी आपल्यातलाच कुणी कृष्ण होतो... आपल्यातलीच कुणी राधा होते... प्रीतवेलीला एक नवं फुल येतं... कवी म्हणतो....

राधाकृष्ण जुनी जोडी
पुन्हा पुन्हा होते नवी
नव्या राधाकृष्णासाठी
नवी गीते नवा कवी

काल आहे हे नवेपण?
तिचं रडणं... त्याचं समजावणं... हे नेहमीचंच... पण...

पाहिले आहे का कुणी
कृष्णदेव रडताना
गाली ओघळले त्याचे
अश्रू राधा पुसताना

राधा किती समजूतदार असली तरी त्याचे उशिरा येणं  काही थांबत नाही. अशा वेळी तिची अवस्था काय होते?

सावळ्या रे भेट आता
नको करूस उशीर
हळव्या मनाची राधा
जीव होतो खाली वर

त्याला यायला उशीर होतो हे खरंपण मग तो आहे तरी कुठेकरतोय तरी काय?

राधे तुझा कृष्ण सखा
वाजवी बासरी रानी
बासरीचा सूर बोले
येई राधे येई राणी

सावळ्या रे तुझ्यासाठी
गाते राधाबाई
त्याची तुझ्या बासरीला
चाहूल का नाही?

आणि मग त्या दोघांची भेट होते...
पहाटेचा गार वारं
राधा कृष्णसवे चाले
गोड शहार्याने
अंग सुखावले

यमुनेच्या तीरावर
कान्हा वाजवी बासरी
राधा वेडी वेडावली
झाली कावरीबावरी

कृष्णाविना राधेला या
नको दुजा कोणी
वेडावून गेला तिला
बासरीचा ध्वनी

आषाढाच्या पावसाने
पूर यमुनेला आला
राधा अति घाबरली
कृष्ण सावरतो तिला

पण कधीतरी एक असाही दिवस येतो...

पैलतिरी राधा
मधी यमुनेला पूर
उडी घाली कृष्ण
तिचा धपापतो ऊर

पूर आला की  यमुना  रौद्र रूप धारण करते. पण  एरवी यमुना इतकी सुखद असते की...

माझे सखे माझे प्रिये
कृष्ण म्हणे जाऊ जळी
मनसोक्त डुंबू करू
एका डोहात अंघोळी

गौरांगी ह्या गोपी न्हाती
यमुनेच्या जळी
कृष्ण येता लाजल्या ग
मोगरीच्या वेली

स्नानासाठी राधा जाते
यमुनेच्या तिरी
कृष्णाची पाउले तिच्या
पावलांच्या वरी

केळी मागे नदीकाठी
न्हाते राधाबाई
कोणती केळ त्यातली
कळेनाच काही

विसाव्याचे राधाबाई
यमुनेच्या तिरी
बसणार एवढ्यात
वाजली बासरी

वेड्या माझ्या राजा कृष्णा
तुला कशी समजाऊ
तुझा राग जाण्यासाठी
कोणते मी गाणे गाऊ

कृष्णा तुझ्या प्रेमापुढे
राधा मी आंधळी होते
तुझ्या प्रेमाच्या पाठीशी
सांग गुपित कोणते...

हेच आंधळेपण तिला त्याच्यामागे धावायला लावते...

कृष्णा आज गोकुळात
सैरावैरा धावू लागे
काय झाले उमगेना
राधा त्याच्या मागे मागे

आणि मग...

मुकुंदाच्या जीवनात
राधिकेच येणं झालं
पहिल्याच मिठीमध्ये
जीवनाच सोनं झालं

राधिकेचे ओठ आज
श्रीकृष्णाच्या ओठी आले
कसे सांगू शब्दांमध्ये
अमृताचे फूल फुले

पण म्हणून ते स्वैराचारी झाली नाहीत. नीतीची भीती कुठेतरी जागी आहेच... म्हणूनच तर...

सांगायचे खुप राधे
परी वाटे भीती
दटावतै सभ्यता नि
भिवविते नीती

राधा म्हणे कृष्णा नको
नको करू असे
चारचौघांमध्ये माझे
होईल ना हसे...

आई ओरडेल आता
राधेच्या मनात भीती
तरी जाता जाता तिचे
ओठ कृष्णाला चुंबिती

गोजिरी ही भेट राधे
दिली तुला कोणी
आणि गुणी सखा माझा
कृष्ण चक्रपाणी

जेव्हा तिच्या स्वप्नांमध्ये
येतो चक्रपाणि
त्याच्यासाठी राधा गाते
झोपेतच गाणी

कृष्णासाठी वेडी झाली राधा झोपतही गाऊ लागते. आता कृष्णाच्या बासरीचा थ्वनी आला की राधा कावरीबावरी होऊ लागते...

कुठे वाजला पावा ग...
कुठे वाजला पावा 
हा तर माझा रावा गं
लपून बसला कृष्ण सावळा
कुणीतरी मजला दावा गं
असाच करतो
जीव म झुरतो
किती करू या याचा धावा ग
रिमझिम गाणी
तनभर पाणी
त्यात सोडतो नावा 
पाऊसधारा
मोरपिसारा
सुरेख संगम झाला ग
कुठे वाजला पावा 
हा तर माझा रावा  


त्या राधेवरच्या या कविता ऐकून आजच्या राधेला प्रश्न पडतो...
का रे लक्ष कविता या
माझ्या देहावर
तुझ्या देही जन्म राधे
जीवनसागर

हा प्रश्न विचारणारी राधा आणि तिचा कृष्ण तुमच्याआमच्यातीलच... या आजच्या राधाकृष्णाचं जगणं कसं आहे... तर हे असं आहे...

नटूनथटून राधे
जाताना बाजारी
इस्त्री कशी मोडली ग
भेटला ना हरी?

जिन्यावरून नकळत
झाला तुझा स्पर्श
राधे माझे वाया गेले
एक पूर्ण वर्ष

हरवेळी फोन राधे
घेते तुझी आई
फोन करणारा मग
बोलतच नाही

आषाढात येतो राधे
गुलाबाचा दिन

रोज डे...

आषाढात येतो राधे
गुलाबाचा दिन
धुंद ढगावर जाते
वीज कोसळून

तुझ्यासाठी सर येते
जाते कोसळून
काय राधे मिळे तुला
वर्गात बसून... 


नको रागावून अशी
राधे रुसून राहूस
रिमझिम पडणारा
जातो फुकट पाऊस

त्याच्या छत्रीतून राधा
फिरायला जाते
दोन्ही अपराध छत्री
पोटात घालते

राधा म्हणे किती वेळा
सांगितले तुला
तुझे माझे गोड गाणे
सांगू नको तिला

हा तिचा पझेसिव्हनेस...

नको कँटीन नि कट्टा
नको हॉटेलबिटेल
राधे चौपाटीला जाऊ
खाऊ चणे खाऊ भेळ

आणि हा एक वेगळाच रंग...

आता तीन महिन्यांनी
लागे पुन्हा डिफॉल्टर
माझ्या संख्या कृष्णा तुझा
बघ पहिला नंबर

कृष्णसखा सगळ्यांना
सांगत सुटला
मॅथ्स गेला तरी माझा
फिजिक्स सुटला

राधा फेल झाली
आला आसवांना पूर
कृष्ण धीर देतो
दूर नाही आक्टोबर

किती वेळा सांगू तुला
घे ना मोबाईल
कृष्ण म्हणे कोण त्याचे
भरणार बिल

एक एवढंच करू
मला स्टेशनला सोड
कृष्ण म्हणे टॅक्सीने जा
हे घे मीच देतो भाडं

एक दिवस राधा-कृष्णाचे लग्न होते त्यांचा संसार सुरू होतो आणि मग दोघे तर प्रेम जीवनातून गद्याकडे सरकणाऱ्या मुक्तछंदात येतात. अर्थात पण म्हणून नात्यातला गोडवा कमी होत नाही...

एकदा राधा कृष्णाला म्हणाली
तू माझे फोटो लाईक करत नाहीस...
कृष्ण म्हणाला
तुझा चेहऱ्यावरून नजर हटत नाही आणि लाईक कोसो मैल दूर आहे तुझ्या चेहर्‍यापासून...

राधेनं एकदा विचारलं
तुझ्या क्रेडिट कार्डचा पिन नंबर काय रे
कृष्ण म्हणाला
जन्मतारीख
राधेनं विचारलं
कोणाची...तुझी की माझी...
कृष्ण म्हणाला
नाही तुझ्या माझ्या नात्याची...
राधा समजून गेली 14 0 2..

राधेनं विचारलं
भेटणाऱ्या प्रत्येक माणसाशी इतक्या प्रेमाने आणि आत्मविश्वासाने कसं काय बोलू शकतोस तू?
कृष्ण म्हणाला
तुलाही जमेल...
फक्त येणारा प्रत्येक माणूस तुझ्या माहेरहून आला आहे असा विचार करत जा...

कृष्णाने एकदा राधेला विचारलं
तू महायुतीत की महाआघाडीत?
राधा लाजत म्हणाली
कोणमी?
मी सत्तेत...

एकदा राधा घाबरली आणि कृष्णाला बिलगली
कृष्णाने तिच्या पाठीवरून हात फिरवत
तिला धीर दिला
राधा म्हणाली
हे असे युगानुयुगे राहता येईल का रे
कृष्ण म्हणाला
येईल पण फक्त मग बासरी वाजवता येणार नाही राधेने चटकन मिठी सोडून
ओठांवर ओठाची बासरी ठेवली...

कृष्ण डिप्रेस झाला तेव्हा
राधेने त्याच्यासाठी बासरी वाजवायला घेतली
तिला सा सुद्धा नीट लावता आला नाही
पण बासरीला छडी समजून
डिप्रेशन घाबरून पळून गेले...

लोकल लटकताना कृष्ण म्हणाला कालियामर्दनावेळी अशी कसरत करायला लागली होती...


राधा कृष्णाचे प्रेम हे धर्मजातीसंस्कृतीच्या पल्याड जाणार होतं. परिस्थितीची किल्मिषे त्याला कधी चिकटली नाहीत. म्हणूनच राधाकृष्ण नित्य स्मरणीय आहेत. अनुकरणीय आहेत. कृष्ण म्हणतो...

एक काळ असा होता
मीच होतो कृष्ण
नाही उगवला कधी
संस्कृतीचा प्रश्न

आणि म्हणूनच...

कृष्ण गेला दूर जेव्हा
सोडून गोकुळ
राधेसवे आईसुद्धा
व्याकुळ व्याकुळ

किती राधाकृष्ण आले
जग फुलवून गेले
इतिहासाच्या पानात
गंध त्यांचा दरवळे

राधाकृष्ण येतातजग फुलतात आणि निघून जातात. इतिहासाच्या पानात त्यांचा गंध दरवळत राहतोपण अशी दरवळणारी धरणी राधा आणि तिचा निळासावळा गगन कृष्ण यांचे प्रेम अनादी काळापासून चालत आले आणि अनंत काळापर्यंत चालत राहणार आहे...

(सुवर्णसुत वैभव बळीराम चाळके )

कुठे वाजला पावा ग?

(सुवर्णसुत वैभव बळीराम चाळके )


त्याचं तिचं बोलगाणं

माझं गाणं प्रिये तुला गाता यायला हवं
आणि तुझ्या गाण्यात मला न्हाता यायला हवं

एक गाणं लिहीन मी चंद्र सूर्य तार्‍यावर
एक गाणं लिहिणे पानं-फुलं वाऱ्यावर
ताऱ्याचं गाणं म्हणताना तारा व्हायचं
वाऱ्याचं गाणं म्हणताना वारा व्हायचं
वार्यासंगे दूरदूर जाता यायला हवं

एक गाणं गोजिरवाणं लिहीन मी तुझ्यावर
एक गाणं आनंदानं लिहीन तुझ्या राजावर
राजालाही राणीसंगे गाता यायला हवं
राणीलाही राजासंगे न्हाता यायला हवं
गाण्यासंगे गाण्याला एक होता यायला हवं

एक गाणं शब्दाविना नुसते नुसते सुर
एक गाणं ज्याच्यामधून सूरसुद्धा दूर
शब्दांच्याही पलीकडचे दिसू लागते काही
अब्दअब्द मनातले साकार रूप घेई
गाणं सगळेच ऐकतात गाणं पाहता यायला हवं
(
सुवर्णसुत वैभव बळीराम चाळके )

युगामागुनी युगे निघून गेलीपण राधाकृष्णाची प्रीतकथा आजही प्रत्येक भारतीयाने ह्रदयकप्प्यात जपून ठेवली आहे. राधाकृष्ण हा इतिहास असेल किंवा कुण्या कवीला पडलेले ते गोड काव्यस्वप्न... पण एवढसं बी युगानुयुगे अनेक कलावंत शिंपत आले आहेत.
आणि म्हणूनच तर राधाकृष्ण ही रूपकवेल हर रसिकाच्या मनात रूजले... बहरलेय... ती बहरलेय तरी तिचं बहरणं थांबलेलं नाही. ती सदाफुली आहे... सतत फुलत राहणारी. राधाकृष्ण हे रूपक आहे स्त्री-पुरुष नात्याचा... त्यांच्यातल्या प्रेमसंबंधात... त्यांच्या गोड मिलनाची.  ही कथा आहे उमलण्याची... फुलण्याची... बहरण्याची... आणि वाऱ्यावर मनसोक्त हिंदळण्याची.. पण ही कथा म्हणजे नुसताच गोडवा नाही... या नितांत सुंदर कथेला दुःखाची भरजरी किनार आहे. ज्यांना हे भरजरी दुःखं अनुभवता येतं त्या सगळ्यांच्या आयुष्याला राधाकृष्णाचा परिसस्पर्श होऊन जातो. मग कधीतरी आपल्यातलाच कुणी कृष्ण होतो... आपल्यातलीच कुणी राधा होते... प्रीतवेलीला एक नवं फुल येतं... कवी म्हणतो....

राधाकृष्ण जुनी जोडी
पुन्हा पुन्हा होते नवी
नव्या राधाकृष्णासाठी
नवी गीते नवा कवी

काल आहे हे नवेपण?
तिचं रडणं... त्याचं समजावणं... हे नेहमीचंच... पण...

पाहिले आहे का कुणी
कृष्णदेव रडताना
गाली ओघळले त्याचे
अश्रू राधा पुसताना

राधा किती समजूतदार असली तरी त्याचे उशिरा येणं  काही थांबत नाही. अशा वेळी तिची अवस्था काय होते?

सावळ्या रे भेट आता
नको करूस उशीर
हळव्या मनाची राधा
जीव होतो खाली वर

त्याला यायला उशीर होतो हे खरंपण मग तो आहे तरी कुठेकरतोय तरी काय?

राधे तुझा कृष्ण सखा
वाजवी बासरी रानी
बासरीचा सूर बोले
येई राधे येई राणी

सावळ्या रे तुझ्यासाठी
गाते राधाबाई
त्याची तुझ्या बासरीला
चाहूल का नाही?

आणि मग त्या दोघांची भेट होते...
पहाटेचा गार वारं
राधा कृष्णसवे चाले
गोड शहार्याने
अंग सुखावले

यमुनेच्या तीरावर
कान्हा वाजवी बासरी
राधा वेडी वेडावली
झाली कावरीबावरी

कृष्णाविना राधेला या
नको दुजा कोणी
वेडावून गेला तिला
बासरीचा ध्वनी

आषाढाच्या पावसाने
पूर यमुनेला आला
राधा अति घाबरली
कृष्ण सावरतो तिला

पण कधीतरी एक असाही दिवस येतो...

पैलतिरी राधा
मधी यमुनेला पूर
उडी घाली कृष्ण
तिचा धपापतो ऊर

पूर आला की  यमुना  रौद्र रूप धारण करते. पण  एरवी यमुना इतकी सुखद असते की...

माझे सखे माझे प्रिये
कृष्ण म्हणे जाऊ जळी
मनसोक्त डुंबू करू
एका डोहात अंघोळी

गौरांगी ह्या गोपी न्हाती
यमुनेच्या जळी
कृष्ण येता लाजल्या ग
मोगरीच्या वेली

स्नानासाठी राधा जाते
यमुनेच्या तिरी
कृष्णाची पाउले तिच्या
पावलांच्या वरी

केळी मागे नदीकाठी
न्हाते राधाबाई
कोणती केळ त्यातली
कळेनाच काही

विसाव्याचे राधाबाई
यमुनेच्या तिरी
बसणार एवढ्यात
वाजली बासरी

वेड्या माझ्या राजा कृष्णा
तुला कशी समजाऊ
तुझा राग जाण्यासाठी
कोणते मी गाणे गाऊ

कृष्णा तुझ्या प्रेमापुढे
राधा मी आंधळी होते
तुझ्या प्रेमाच्या पाठीशी
सांग गुपित कोणते...

हेच आंधळेपण तिला त्याच्यामागे धावायला लावते...

कृष्णा आज गोकुळात
सैरावैरा धावू लागे
काय झाले उमगेना
राधा त्याच्या मागे मागे

आणि मग...

मुकुंदाच्या जीवनात
राधिकेच येणं झालं
पहिल्याच मिठीमध्ये
जीवनाच सोनं झालं

राधिकेचे ओठ आज
श्रीकृष्णाच्या ओठी आले
कसे सांगू शब्दांमध्ये
अमृताचे फूल फुले

पण म्हणून ते स्वैराचारी झाली नाहीत. नीतीची भीती कुठेतरी जागी आहेच... म्हणूनच तर...

सांगायचे खुप राधे
परी वाटे भीती
दटावतै सभ्यता नि
भिवविते नीती

राधा म्हणे कृष्णा नको
नको करू असे
चारचौघांमध्ये माझे
होईल ना हसे...

आई ओरडेल आता
राधेच्या मनात भीती
तरी जाता जाता तिचे
ओठ कृष्णाला चुंबिती

गोजिरी ही भेट राधे
दिली तुला कोणी
आणि गुणी सखा माझा
कृष्ण चक्रपाणी

जेव्हा तिच्या स्वप्नांमध्ये
येतो चक्रपाणि
त्याच्यासाठी राधा गाते
झोपेतच गाणी

कृष्णासाठी वेडी झाली राधा झोपतही गाऊ लागते. आता कृष्णाच्या बासरीचा थ्वनी आला की राधा कावरीबावरी होऊ लागते...

कुठे वाजला पावा ग...
कुठे वाजला पावा 
हा तर माझा रावा गं
लपून बसला कृष्ण सावळा
कुणीतरी मजला दावा गं
असाच करतो
जीव म झुरतो
किती करू या याचा धावा ग
रिमझिम गाणी
तनभर पाणी
त्यात सोडतो नावा 
पाऊसधारा
मोरपिसारा
सुरेख संगम झाला ग
कुठे वाजला पावा 
हा तर माझा रावा  


त्या राधेवरच्या या कविता ऐकून आजच्या राधेला प्रश्न पडतो...
का रे लक्ष कविता या
माझ्या देहावर
तुझ्या देही जन्म राधे
जीवनसागर

हा प्रश्न विचारणारी राधा आणि तिचा कृष्ण तुमच्याआमच्यातीलच... या आजच्या राधाकृष्णाचं जगणं कसं आहे... तर हे असं आहे...

नटूनथटून राधे
जाताना बाजारी
इस्त्री कशी मोडली ग
भेटला ना हरी?

जिन्यावरून नकळत
झाला तुझा स्पर्श
राधे माझे वाया गेले
एक पूर्ण वर्ष

हरवेळी फोन राधे
घेते तुझी आई
फोन करणारा मग
बोलतच नाही

आषाढात येतो राधे
गुलाबाचा दिन

रोज डे...

आषाढात येतो राधे
गुलाबाचा दिन
धुंद ढगावर जाते
वीज कोसळून

तुझ्यासाठी सर येते
जाते कोसळून
काय राधे मिळे तुला
वर्गात बसून... 


नको रागावून अशी
राधे रुसून राहूस
रिमझिम पडणारा
जातो फुकट पाऊस

त्याच्या छत्रीतून राधा
फिरायला जाते
दोन्ही अपराध छत्री
पोटात घालते

राधा म्हणे किती वेळा
सांगितले तुला
तुझे माझे गोड गाणे
सांगू नको तिला

हा तिचा पझेसिव्हनेस...

नको कँटीन नि कट्टा
नको हॉटेलबिटेल
राधे चौपाटीला जाऊ
खाऊ चणे खाऊ भेळ

आणि हा एक वेगळाच रंग...

आता तीन महिन्यांनी
लागे पुन्हा डिफॉल्टर
माझ्या संख्या कृष्णा तुझा
बघ पहिला नंबर

कृष्णसखा सगळ्यांना
सांगत सुटला
मॅथ्स गेला तरी माझा
फिजिक्स सुटला

राधा फेल झाली
आला आसवांना पूर
कृष्ण धीर देतो
दूर नाही आक्टोबर

किती वेळा सांगू तुला
घे ना मोबाईल
कृष्ण म्हणे कोण त्याचे
भरणार बिल

एक एवढंच करू
मला स्टेशनला सोड
कृष्ण म्हणे टॅक्सीने जा
हे घे मीच देतो भाडं

एक दिवस राधा-कृष्णाचे लग्न होते त्यांचा संसार सुरू होतो आणि मग दोघे तर प्रेम जीवनातून गद्याकडे सरकणाऱ्या मुक्तछंदात येतात. अर्थात पण म्हणून नात्यातला गोडवा कमी होत नाही...

एकदा राधा कृष्णाला म्हणाली
तू माझे फोटो लाईक करत नाहीस...
कृष्ण म्हणाला
तुझा चेहऱ्यावरून नजर हटत नाही आणि लाईक कोसो मैल दूर आहे तुझ्या चेहर्‍यापासून...

राधेनं एकदा विचारलं
तुझ्या क्रेडिट कार्डचा पिन नंबर काय रे
कृष्ण म्हणाला
जन्मतारीख
राधेनं विचारलं
कोणाची...तुझी की माझी...
कृष्ण म्हणाला
नाही तुझ्या माझ्या नात्याची...
राधा समजून गेली 14 0 2..

राधेनं विचारलं
भेटणाऱ्या प्रत्येक माणसाशी इतक्या प्रेमाने आणि आत्मविश्वासाने कसं काय बोलू शकतोस तू?
कृष्ण म्हणाला
तुलाही जमेल...
फक्त येणारा प्रत्येक माणूस तुझ्या माहेरहून आला आहे असा विचार करत जा...

कृष्णाने एकदा राधेला विचारलं
तू महायुतीत की महाआघाडीत?
राधा लाजत म्हणाली
कोणमी?
मी सत्तेत...

एकदा राधा घाबरली आणि कृष्णाला बिलगली
कृष्णाने तिच्या पाठीवरून हात फिरवत
तिला धीर दिला
राधा म्हणाली
हे असे युगानुयुगे राहता येईल का रे
कृष्ण म्हणाला
येईल पण फक्त मग बासरी वाजवता येणार नाही राधेने चटकन मिठी सोडून
ओठांवर ओठाची बासरी ठेवली...

कृष्ण डिप्रेस झाला तेव्हा
राधेने त्याच्यासाठी बासरी वाजवायला घेतली
तिला सा सुद्धा नीट लावता आला नाही
पण बासरीला छडी समजून
डिप्रेशन घाबरून पळून गेले...

लोकल लटकताना कृष्ण म्हणाला कालियामर्दनावेळी अशी कसरत करायला लागली होती...


राधा कृष्णाचे प्रेम हे धर्मजातीसंस्कृतीच्या पल्याड जाणार होतं. परिस्थितीची किल्मिषे त्याला कधी चिकटली नाहीत. म्हणूनच राधाकृष्ण नित्य स्मरणीय आहेत. अनुकरणीय आहेत. कृष्ण म्हणतो...

एक काळ असा होता
मीच होतो कृष्ण
नाही उगवला कधी
संस्कृतीचा प्रश्न

आणि म्हणूनच...

कृष्ण गेला दूर जेव्हा
सोडून गोकुळ
राधेसवे आईसुद्धा
व्याकुळ व्याकुळ

किती राधाकृष्ण आले
जग फुलवून गेले
इतिहासाच्या पानात
गंध त्यांचा दरवळे

राधाकृष्ण येतातजग फुलतात आणि निघून जातात. इतिहासाच्या पानात त्यांचा गंध दरवळत राहतोपण अशी दरवळणारी धरणी राधा आणि तिचा निळासावळा गगन कृष्ण यांचे प्रेम अनादी काळापासून चालत आले आणि अनंत काळापर्यंत चालत राहणार आहे...

(सुवर्णसुत वैभव बळीराम चाळके 9702723652 )


No comments:

Post a Comment